शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा गावात पाणी टंचाई

By admin | Updated: May 17, 2015 01:27 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.

नागरिकांचे हाल : ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीची घाईपोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र आजमितीला सहा वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा सदर टाकीत पाणीच साठविण्यात न आल्याने ही टाकी स्वत:च पाण्यासाठी व्याकूळ झाली असल्याचे भीषण वास्तव येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. ेदुसरीकडे मात्र ग्रामपंचायत सदस्य गावात पाणी टंचाई असताना निवडणुकीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे मागील १५ वर्षांपासून ७२ हजार लिटर क्षमतेची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीमुळे नळजोडणीधारकांच्या संख्येतही भर पडत आहे. सदर योजनेच्या पाईप लाईनचे काम अत्यंत सदोष पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजमधून पाणी वाया जात आहे. परिणामी गावातील नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी या नेहमीच्या पाणी टंचाईला कंटाळून लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती केली. यावर देखरेखीसाठी पाणी पुरवठा समितीची स्थापनासुद्धा करण्यात आली. एका कंत्राटदाराकडे सदर योजनेचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र या कामावर पाणी पुरवठा समिती तसेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे सदर योजनेला सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनसुद्धा ही योजना तहानलेलीच आहे. याठिकाणी पाण्याच्या भूगर्भाची पातळी अतिशय खोल गेल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्येच विहिरी कोरडे होतात, तर हॅन्डपंपाना फार अल्प प्रमाणात पाणी असते. गावात अनेक वर्षांपासून ही स्थिती भेडसावत आहे. एप्रिल-मे महिन्यांमध्ये तर येथील नागरिक बैलबंडीद्वारे शेतातील विहिरीचे व तलावाचे पाणी आणताना दिसतात. एवढी गंभीर समस्या याठिकाणी उद्भवत असताना येथील ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र स्थानिक नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याऐवजी आॅगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची व्यूहरचना आखत असून कोणत्या वार्डात कोणते उमेदवार उभे करायचे, याचा शोध घेण्यात व्यस्त झाले आहेत.यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाहिजे, त्या प्रमाणात तलावामध्ये शिल्लक पाणी उरले नाही. आणि अंधारी नदीचे पात्र सुद्धा कोरडे होत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी येणार नाही. मग पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. पुढे जनावरांना पाणी मिळणेसुद्धा दुरापास्थ होणार असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मात्र पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व अभियंते याबाबत उदासिन असून त्यांचेसुद्धा यावर नियंत्रण नसल्याने गावात पाण्याचे दोन टाकी असूनसुद्धा गावातील नागरिक तहानलेलेच आहे. पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांना आतापर्यंत या योजनेवर किती खर्च झाला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी किती खर्च झाला, किती रक्कम उचल करण्यात आली, याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सभा सुद्धा घेण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे. यावरुन सदर प्रकरणात फार मोठे गौडबंगाल झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठांमार्फत चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघकीस येणार असल्याचे समजते. त्यामुळे यावर नियंत्रक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करुन सहा वर्षांपासून सुरू असलेल्या भारत निर्माण योजनेचे पाणी कुठे मुरत आहे, याचा शोध घेऊन संबंधित प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)