शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

देवाडा गावात पाणी टंचाई

By admin | Updated: May 17, 2015 01:27 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.

नागरिकांचे हाल : ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीची घाईपोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र आजमितीला सहा वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा सदर टाकीत पाणीच साठविण्यात न आल्याने ही टाकी स्वत:च पाण्यासाठी व्याकूळ झाली असल्याचे भीषण वास्तव येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. ेदुसरीकडे मात्र ग्रामपंचायत सदस्य गावात पाणी टंचाई असताना निवडणुकीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे मागील १५ वर्षांपासून ७२ हजार लिटर क्षमतेची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीमुळे नळजोडणीधारकांच्या संख्येतही भर पडत आहे. सदर योजनेच्या पाईप लाईनचे काम अत्यंत सदोष पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजमधून पाणी वाया जात आहे. परिणामी गावातील नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी या नेहमीच्या पाणी टंचाईला कंटाळून लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती केली. यावर देखरेखीसाठी पाणी पुरवठा समितीची स्थापनासुद्धा करण्यात आली. एका कंत्राटदाराकडे सदर योजनेचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र या कामावर पाणी पुरवठा समिती तसेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे सदर योजनेला सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनसुद्धा ही योजना तहानलेलीच आहे. याठिकाणी पाण्याच्या भूगर्भाची पातळी अतिशय खोल गेल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्येच विहिरी कोरडे होतात, तर हॅन्डपंपाना फार अल्प प्रमाणात पाणी असते. गावात अनेक वर्षांपासून ही स्थिती भेडसावत आहे. एप्रिल-मे महिन्यांमध्ये तर येथील नागरिक बैलबंडीद्वारे शेतातील विहिरीचे व तलावाचे पाणी आणताना दिसतात. एवढी गंभीर समस्या याठिकाणी उद्भवत असताना येथील ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र स्थानिक नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याऐवजी आॅगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची व्यूहरचना आखत असून कोणत्या वार्डात कोणते उमेदवार उभे करायचे, याचा शोध घेण्यात व्यस्त झाले आहेत.यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाहिजे, त्या प्रमाणात तलावामध्ये शिल्लक पाणी उरले नाही. आणि अंधारी नदीचे पात्र सुद्धा कोरडे होत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी येणार नाही. मग पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. पुढे जनावरांना पाणी मिळणेसुद्धा दुरापास्थ होणार असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मात्र पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व अभियंते याबाबत उदासिन असून त्यांचेसुद्धा यावर नियंत्रण नसल्याने गावात पाण्याचे दोन टाकी असूनसुद्धा गावातील नागरिक तहानलेलेच आहे. पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांना आतापर्यंत या योजनेवर किती खर्च झाला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी किती खर्च झाला, किती रक्कम उचल करण्यात आली, याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सभा सुद्धा घेण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे. यावरुन सदर प्रकरणात फार मोठे गौडबंगाल झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठांमार्फत चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघकीस येणार असल्याचे समजते. त्यामुळे यावर नियंत्रक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करुन सहा वर्षांपासून सुरू असलेल्या भारत निर्माण योजनेचे पाणी कुठे मुरत आहे, याचा शोध घेऊन संबंधित प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)