शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची गती मंदावली

By admin | Updated: June 8, 2015 01:45 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले.

केवळ ३४० कामे पूर्ण : अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभावचंद्रपूर : वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी घटली. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्ह्यात झालेल्या कामांची स्थिती पाहता योजनेची कामे मंदावल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार अभियानार्तंगत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली. मात्र यातील केवळ १६५ गावांमध्येच प्रत्यक्ष कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या गावांत ५६० कामे प्रस्तावित असून यातील केवळ ३४० कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात डिसेंबर महिन्यात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले. तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले होते. याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान सुरू करण्याचे आखले. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तसेच जुन्या जलसंरचनाचे पुर्नजिवन करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतणीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे, छोटे ओढे व नाल्यांची जोडणी करणे, कालव्याची स्वच्छता करणे, विहिर बोअरवेल पुनर्भरण, अस्तीत्वात असलेल्या लघु पाटबंधाऱ्याच्या कामाला गती देणे आदी कामे प्राधान्याने होणे गरजेचे असताना प्रशासनाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने कामांची गती मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) जिल्हास्तरीय निधीतून कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात येत आहेत. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून होणार असून या कामांचे मूल्यमापनही शासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र अधिकाऱ्यांचेच कामांकडे दुर्लक्ष होताना कामाच्या स्थितीवरून दिसून येते.सिंचनालाही लागणार होता हातभारजिल्ह्यातील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू स्वरूपाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय करावा लागतो. शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून सावरण्यासाठी व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. मात्र अनेक कामे पावसाळ्यापूर्वी अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना पून्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसू लागली आहे.