शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राजुरा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:06 IST

राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत.

ठळक मुद्देराजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे.

राजुरा - राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील जवळपास तीन हजारावर ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावात २५ विहीर व ११ हातपंप सार्वजनिक आहेत, मात्र उन्हाळयाची चाहुल लागण्यापुर्वीच या विहिरींनी तळ गाठला. ग्रामस्थांना सर्वाधिक पाणी पुरवठा करणारी विहीर म्हणून ओळखली जाणारी वार्ड क्रमांक तीन मधील बौध्द वस्तीतील गोड्या पाण्याची विहीरही महिनाभरापूर्वीच कोरडी पडली. त्यामुळे विशेषत: मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे. गावात बोटावर मोजण्याएवढ्याच घरगुती कुपनलिका असून, त्यासुद्धा किती दिवस तहान भागवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे इतरांना पाणी दिल्यास आपले काय, या विवंचनेत कुपनलिका धारक शेजाऱ्या पाजाऱ्यांना हांडाभर पाणी देण्यासाठीही मागे पुढे बघत असल्याचे वास्तव आहे.

अलिकडच्या दशकभरात राजुरा अन पाणी टंचाईच्या काळात टँकर हे जणु इथल समीकरणच झाल आहे. येथील जनतेची कायम स्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्यासाठी चाकातिर्थ संग्राहक तलाव अथवा तीन कि़मी. अंतरावरील सुदी येथील संग्राहक तलावातून पाणी पुरवठा योजना कार्यक्षम ठरु शकते, मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दमदार नेतृत्वाअभावी येथील पाणी पुरवठा योजनेचे स्वप्न ग्रामस्थांसाठी एक मृगजळ ठरताना दिसत आहे. गावानजिक छोटेमोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. अनेकदा नदी नाल्यावरील तलाव कामाचे सर्वेक्षण सुध्दा झाले. मात्र राजकीय शह-काटशह अथवा श्रेयवादाच्या कुरघोडीत येथील तलावाचा प्रश्न सर्वेक्षणापुढे सरकू शकला नाही. परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठीही पुरेसा वाव आहे; परंतु यातही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता दिसत आहे.

टॅग्स :Waterपाणी