शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

राजुरा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:06 IST

राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत.

ठळक मुद्देराजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे.

राजुरा - राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील जवळपास तीन हजारावर ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावात २५ विहीर व ११ हातपंप सार्वजनिक आहेत, मात्र उन्हाळयाची चाहुल लागण्यापुर्वीच या विहिरींनी तळ गाठला. ग्रामस्थांना सर्वाधिक पाणी पुरवठा करणारी विहीर म्हणून ओळखली जाणारी वार्ड क्रमांक तीन मधील बौध्द वस्तीतील गोड्या पाण्याची विहीरही महिनाभरापूर्वीच कोरडी पडली. त्यामुळे विशेषत: मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे. गावात बोटावर मोजण्याएवढ्याच घरगुती कुपनलिका असून, त्यासुद्धा किती दिवस तहान भागवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे इतरांना पाणी दिल्यास आपले काय, या विवंचनेत कुपनलिका धारक शेजाऱ्या पाजाऱ्यांना हांडाभर पाणी देण्यासाठीही मागे पुढे बघत असल्याचे वास्तव आहे.

अलिकडच्या दशकभरात राजुरा अन पाणी टंचाईच्या काळात टँकर हे जणु इथल समीकरणच झाल आहे. येथील जनतेची कायम स्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्यासाठी चाकातिर्थ संग्राहक तलाव अथवा तीन कि़मी. अंतरावरील सुदी येथील संग्राहक तलावातून पाणी पुरवठा योजना कार्यक्षम ठरु शकते, मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दमदार नेतृत्वाअभावी येथील पाणी पुरवठा योजनेचे स्वप्न ग्रामस्थांसाठी एक मृगजळ ठरताना दिसत आहे. गावानजिक छोटेमोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. अनेकदा नदी नाल्यावरील तलाव कामाचे सर्वेक्षण सुध्दा झाले. मात्र राजकीय शह-काटशह अथवा श्रेयवादाच्या कुरघोडीत येथील तलावाचा प्रश्न सर्वेक्षणापुढे सरकू शकला नाही. परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठीही पुरेसा वाव आहे; परंतु यातही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता दिसत आहे.

टॅग्स :Waterपाणी