शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

राजुरा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:06 IST

राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत.

ठळक मुद्देराजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे.

राजुरा - राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्यास येथील पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील जवळपास तीन हजारावर ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावात २५ विहीर व ११ हातपंप सार्वजनिक आहेत, मात्र उन्हाळयाची चाहुल लागण्यापुर्वीच या विहिरींनी तळ गाठला. ग्रामस्थांना सर्वाधिक पाणी पुरवठा करणारी विहीर म्हणून ओळखली जाणारी वार्ड क्रमांक तीन मधील बौध्द वस्तीतील गोड्या पाण्याची विहीरही महिनाभरापूर्वीच कोरडी पडली. त्यामुळे विशेषत: मागासवर्गीय वस्तीत पाणी समस्या गंभीर झाली आहे. गावात बोटावर मोजण्याएवढ्याच घरगुती कुपनलिका असून, त्यासुद्धा किती दिवस तहान भागवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे इतरांना पाणी दिल्यास आपले काय, या विवंचनेत कुपनलिका धारक शेजाऱ्या पाजाऱ्यांना हांडाभर पाणी देण्यासाठीही मागे पुढे बघत असल्याचे वास्तव आहे.

अलिकडच्या दशकभरात राजुरा अन पाणी टंचाईच्या काळात टँकर हे जणु इथल समीकरणच झाल आहे. येथील जनतेची कायम स्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्यासाठी चाकातिर्थ संग्राहक तलाव अथवा तीन कि़मी. अंतरावरील सुदी येथील संग्राहक तलावातून पाणी पुरवठा योजना कार्यक्षम ठरु शकते, मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दमदार नेतृत्वाअभावी येथील पाणी पुरवठा योजनेचे स्वप्न ग्रामस्थांसाठी एक मृगजळ ठरताना दिसत आहे. गावानजिक छोटेमोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. अनेकदा नदी नाल्यावरील तलाव कामाचे सर्वेक्षण सुध्दा झाले. मात्र राजकीय शह-काटशह अथवा श्रेयवादाच्या कुरघोडीत येथील तलावाचा प्रश्न सर्वेक्षणापुढे सरकू शकला नाही. परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठीही पुरेसा वाव आहे; परंतु यातही लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता दिसत आहे.

टॅग्स :Waterपाणी