शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मूल शहरात पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:34 IST

मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटी ७१ लाख रुपयांची योजना हरणघाट येथील वैनगंगा नदीवरुन कार्यान्वीत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवैनगंगा नदी कोरडी : नगरपालिकेचे प्रयत्न सुरु

राजू गेडाम।आॅनलाईन लोकमतमूल : मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटी ७१ लाख रुपयांची योजना हरणघाट येथील वैनगंगा नदीवरुन कार्यान्वीत करण्यात आली आहे. मात्र यावर्षी पाणी कमी पडल्याने वैनगंगा नदीतील पात्र मार्च महिन्यांतच कोरडे पडले आहे. त्यामुळे मूल शहराला पाणी टंचाईच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी व नगर प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून नदी पात्रात खोल खड्डा करून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही स्थिती बघता, शहरात पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.मूल नगर परिषदेच्या सन २०११ च्या जनगनेनुसार मूलची लोकसंख्या २५ हजार असली तरी सद्यास्थितीत ३० हजारापर्यंत लोकसंख्या पोहचली आहे. त्यानुसार १०० मि.मी. पाणी लक्षात घेता ३० लाख लिटर पाणी पुरवठा दर दिवशी शहराला आवश्यक आहे. मात्र दहा लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यापेक्षा कमी पाणीपुरवठा झाला. तर पाण्यासाठी शहरवासियांचा उद्रेक होणे स्वाभाविकच आहे.सद्याची पाण्याची टंचाई लक्षात घेता गोसीखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडून यावर्षी मूल शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू असल्याने या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग यावर्षी होणार नाही असे दिसते.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पाणी पुरवठा सभापती विद्या बोबाटे, नगरसेविका प्रभा चौथाले, पाणी पुरवठा लिपिक विनोद येनूरकर यांनी वैनगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजनेला भेट दिली.दरम्यान पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर चर्चा केली. शहर वासियांना पाणी मिळावे यासाठी नदीवर खोल खड्डा करून उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले त्यामुळे तात्पुर्ती पाण्याची सोय झाली आहे. मात्र उन्हाची तीव्रता बघता एप्रिल मे महिन्यांत मूलवासियांवर पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याचे चित्र दिसत असले तरी, शहरातील पाणी पुरवठा संदर्भात न.प. पदाधिकारी व प्रशासन संवेदनशिल असल्याचे दिसून येत आहे.मूल शहराला पाणी पुरवठा वैनगंगा नदीवरुन केला जातो. मात्र यावर्षी मार्च महिन्यातच नदी कोरडी झाली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता पाणी वाहत असलेल्या ठिकाणी खड्डा खोदून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात बंधारा देखील बांधण्याची योजना आहे. तसेच गोसीखुर्द प्रकल्पातील पाणी नदीत सोडण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.- रत्नमाला भोयर, नगराध्यक्ष,मूलवैनगंगा नदीवरील नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याबाबत गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन प्रकल्पाच्या पाणी द्यावे, यासंदर्भात चर्चा सुरु आहे. पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मूल शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जाईल.विजयकुमार सरनाईकमुख्याधिकारी न.प. मूल