शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

अवैध वाळू उपस्यामुळे पाणी टंचाईचे संकट

By admin | Updated: February 3, 2016 01:05 IST

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध वाळू उत्खनाला पायबंद घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची सुचना केली जाते ...

ब्रह्मपुरी : एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध वाळू उत्खनाला पायबंद घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची सुचना केली जाते तर दुसरीकडे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांशी असलेल्या संगनमताने वैनगंगा नदीपात्रातून अवैध उत्खनन होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिण्यातच तालुक्यातील अनेक पाण्याचे स्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता अवैध वाळू उपशावर ताबडतोब पायबंद लावण्याची मागणी केली जात आहे. वाळू उपशासाठी वैनगंगा नदीवर असलेल्या काही घाटांचा समावेश आहे. या तिन्ही घाटातून कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळणे अपेक्षित होता. परंतु तालुक्यातील अनेक घाटांचा लिलाव न झाल्याने तो मिळाला नाही. परिणामी तस्करांकडून वाळूचे अवैध उत्खनन जोमात सुरू झाले आहे. वाळूचे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसरीकडे नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. नदीपात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले आहेत. अनेक नदीकाठच्या गावातून रेतीचे रात्री-बेरात्री ने-आण सुरू आहे. हा प्रकार एखाद्याने निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होते. परिणामी नदीकाठावरील विहिरींच्या पाण्याची पातळी भविष्यात खालावण्याची शक्यता असून प्रशासनाने वाळू उपसा बंद करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)पैसे घेऊन सोडले जाते वाहनवैनगंगा वाळू उत्खननात टॉप टू बॉटम वाहनाला पकडण्याचे कार्य करतात परंतु पैसे घेवून वाहन सोडल्या जात असल्याने उत्खनन करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसुलाला प्रशासन मुकत आहे. यातून तक्रारकर्त्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका वाहनावर कारवाईदरम्यान, वाढत्या तक्रारी लक्षात घेता येथील महसूल विभागाने वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई केली. ही मोहिम अशीच कायम ठेवल्यास वाळूचा उपसा कमी होईल. त्यामुळे महसूल विभागाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी विशेष मोहिम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.