शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 3, 2014 23:58 IST

कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला.

अशोककुमार भगत - कोरपनाकोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. या गावांसाठी उपाययोजना कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या असल्या, तरी ही कामे प्रत्यक्षात केव्हा सुरू होतील, असा प्रश्न त्रस्त नागरिकांना पडला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजनांची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील पं.स. च्या कृती आराखड्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. सध्या तालुक्यातील विरुर (गाडे), पारडी, गाडेगाव, उपरवाही, गडचांदूर, लखमापूर, नारंडा, पिपरी, धानोली, खैरगाव, पांडवगुडा, इरई, बोरगाव, खैरगाव, अंतरगाव, सांगोडा, परसोडा, बाखर्डी, कवठाळा, भोयगाव, भारोसासह सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि नदी, नाले, तलाव कोरडे पडू लागल्याने पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. तालुक्यात अंमलनाला व पकडीगुड्डम हे दोन जलाशय असून नारंडा आणि नांदगाव (सूर्य) येथे गावतलाव आहेत. तेथील जलस्तर खालावला आहे. तालुक्याच्या सिमेवरुन वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्या प्रवाहीत होत असल्या तरी नदी काठावरील सुमारे १६ गावे तहानलेलीच आहेत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई अशा दुहेरी कात्रीत ही गावे अडकली आहेत.सुमारे ३५ हजार लोकवस्तीच्या गडचांदूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वॉर्डात नळांना पाणी येत नसल्यामुळे हातपंपावर रांगा लावून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. नाल्याच्या जुन्या विहिरीतील पाणी जलकुंभात साठवल्यानंतर त्याचे वितरण जलवाहिन्यांच्या माध्यमातून गावात केले जाते. ३0 वर्षे जुन्या असलेल्या  या जलवाहिन्या जिर्ण झाल्याने पाणी गळती वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गडचांदूरसाठी ११ कोटी ७६ लाखांची नळयोजना मंजूर करण्यात आली. दोन वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्णच आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये जलशुद्धीकरण संयत्र उभारले असून जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या वॉर्डातील भीषण पाणी टंचाई बघता २६ एप्रिलपासून नजीकच्या गोपालपूर येथील खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. गडचांदुरात तब्बल १८२ शासकीय हातपंप असून यांपैकी ५0 च्या वर पंपानी उन्हाळ्यापूर्वीच ‘हात’ टेकले. त्याची अद्यापही दुरुस्ती झाली नाही.टंचाईग्रस्त भागातील पाणी योजना राबविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पंचायत समितीद्वारा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने विरुर (गाडे), भोयगाव, कातलाबोडी, खैरगाव, कुकूडबोडी, धानोली, निमनी येथील नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. ही कामे कासवगतीने सुरू आहेत. पारडी, उपरवाही, धानोली तांडा, गाडेगाव, पांडवगुडा येथील हातपंपाची कामे प्रस्तावित असली तरी या कामांना अद्यापही सुरुवातच झाली नाही. या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासन पाणी टंचाई व त्यावर केलेल्या नियोजनाचे केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात भीषण टंचाईच्या झळा मात्र जनसामान्यांना सोसाव्या लागत आहे.