शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: June 3, 2014 23:58 IST

कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला.

अशोककुमार भगत - कोरपनाकोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्‍या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. या गावांसाठी उपाययोजना कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या असल्या, तरी ही कामे प्रत्यक्षात केव्हा सुरू होतील, असा प्रश्न त्रस्त नागरिकांना पडला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजनांची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील पं.स. च्या कृती आराखड्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. सध्या तालुक्यातील विरुर (गाडे), पारडी, गाडेगाव, उपरवाही, गडचांदूर, लखमापूर, नारंडा, पिपरी, धानोली, खैरगाव, पांडवगुडा, इरई, बोरगाव, खैरगाव, अंतरगाव, सांगोडा, परसोडा, बाखर्डी, कवठाळा, भोयगाव, भारोसासह सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि नदी, नाले, तलाव कोरडे पडू लागल्याने पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. तालुक्यात अंमलनाला व पकडीगुड्डम हे दोन जलाशय असून नारंडा आणि नांदगाव (सूर्य) येथे गावतलाव आहेत. तेथील जलस्तर खालावला आहे. तालुक्याच्या सिमेवरुन वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्या प्रवाहीत होत असल्या तरी नदी काठावरील सुमारे १६ गावे तहानलेलीच आहेत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई अशा दुहेरी कात्रीत ही गावे अडकली आहेत.सुमारे ३५ हजार लोकवस्तीच्या गडचांदूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वॉर्डात नळांना पाणी येत नसल्यामुळे हातपंपावर रांगा लावून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. नाल्याच्या जुन्या विहिरीतील पाणी जलकुंभात साठवल्यानंतर त्याचे वितरण जलवाहिन्यांच्या माध्यमातून गावात केले जाते. ३0 वर्षे जुन्या असलेल्या  या जलवाहिन्या जिर्ण झाल्याने पाणी गळती वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गडचांदूरसाठी ११ कोटी ७६ लाखांची नळयोजना मंजूर करण्यात आली. दोन वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्णच आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये जलशुद्धीकरण संयत्र उभारले असून जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या वॉर्डातील भीषण पाणी टंचाई बघता २६ एप्रिलपासून नजीकच्या गोपालपूर येथील खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. गडचांदुरात तब्बल १८२ शासकीय हातपंप असून यांपैकी ५0 च्या वर पंपानी उन्हाळ्यापूर्वीच ‘हात’ टेकले. त्याची अद्यापही दुरुस्ती झाली नाही.टंचाईग्रस्त भागातील पाणी योजना राबविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पंचायत समितीद्वारा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने विरुर (गाडे), भोयगाव, कातलाबोडी, खैरगाव, कुकूडबोडी, धानोली, निमनी येथील नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. ही कामे कासवगतीने सुरू आहेत. पारडी, उपरवाही, धानोली तांडा, गाडेगाव, पांडवगुडा येथील हातपंपाची कामे प्रस्तावित असली तरी या कामांना अद्यापही सुरुवातच झाली नाही. या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासन पाणी टंचाई व त्यावर केलेल्या नियोजनाचे केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात भीषण टंचाईच्या झळा मात्र जनसामान्यांना सोसाव्या लागत आहे.