शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

६० हजार हेक्टर क्षेत्रात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:10 IST

शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देआसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण : मूल, पोंभुर्णा व सावतीतील ८२ गावांना संजीवनी

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.आसोलामेंढा प्रकल्प सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळ ब्रिटीशकालीन पूर्ण झालेला प्रकल्प आहे. गोसीखुर्द धरण पूर्ण झाल्यानंतर वैनगंगा नदीतील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावर ११ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात सााठविता येते. त्यासाठी तलावाची उंची २.७० मीटरने वाढवून आसोलामेंढा कालव्याची वहन क्षमता १.७ क्युमेक्स करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे ५४ हजार ८७९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाची सिंचन क्षमता जुलै २०१९ पर्यंत १५ हजार ९७९ हेक्टर आहे. आसोलामेंढा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये ११ गावे येतात. बुडीत गावांचे पुनर्वसन केल्या जाणार आहे. यासाठी १४.३३ हेक्टर आर. जागा ताब्यात घेण्यात आली.असे होईल विस्तारीकरणआसोलामेंढा प्रकल्पाचा मुख्य कालवा ४१.३७ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये ३ शाखा कालवे, २० वितरीका, ४२ लघु कालवे व २१ थेट विमोचके असणार आहे. आसोलामेंढा प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम असल्याने वाढीव क्षेत्राकरिता नुतनीकरण केले जात आहे. सन २०१९-२० या वर्षात पूर्ण लाभक्षेत्राची सिंचन क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावरील ९९ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात साठविल्या जाईल. याकरिता तलावाची उंची २.७० मीटरने वाढणार आहे. परिणामी, आसालोमेंढा प्रकल्पामुळे ८२ गावांत जलसमृद्धी येणार आहे.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरणagricultureशेती