शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

६० हजार हेक्टर क्षेत्रात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:10 IST

शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देआसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण : मूल, पोंभुर्णा व सावतीतील ८२ गावांना संजीवनी

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.आसोलामेंढा प्रकल्प सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळ ब्रिटीशकालीन पूर्ण झालेला प्रकल्प आहे. गोसीखुर्द धरण पूर्ण झाल्यानंतर वैनगंगा नदीतील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावर ११ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात सााठविता येते. त्यासाठी तलावाची उंची २.७० मीटरने वाढवून आसोलामेंढा कालव्याची वहन क्षमता १.७ क्युमेक्स करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे ५४ हजार ८७९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाची सिंचन क्षमता जुलै २०१९ पर्यंत १५ हजार ९७९ हेक्टर आहे. आसोलामेंढा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये ११ गावे येतात. बुडीत गावांचे पुनर्वसन केल्या जाणार आहे. यासाठी १४.३३ हेक्टर आर. जागा ताब्यात घेण्यात आली.असे होईल विस्तारीकरणआसोलामेंढा प्रकल्पाचा मुख्य कालवा ४१.३७ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये ३ शाखा कालवे, २० वितरीका, ४२ लघु कालवे व २१ थेट विमोचके असणार आहे. आसोलामेंढा प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम असल्याने वाढीव क्षेत्राकरिता नुतनीकरण केले जात आहे. सन २०१९-२० या वर्षात पूर्ण लाभक्षेत्राची सिंचन क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावरील ९९ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात साठविल्या जाईल. याकरिता तलावाची उंची २.७० मीटरने वाढणार आहे. परिणामी, आसालोमेंढा प्रकल्पामुळे ८२ गावांत जलसमृद्धी येणार आहे.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरणagricultureशेती