शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

६० हजार हेक्टर क्षेत्रात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:10 IST

शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देआसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण : मूल, पोंभुर्णा व सावतीतील ८२ गावांना संजीवनी

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.आसोलामेंढा प्रकल्प सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळ ब्रिटीशकालीन पूर्ण झालेला प्रकल्प आहे. गोसीखुर्द धरण पूर्ण झाल्यानंतर वैनगंगा नदीतील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावर ११ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात सााठविता येते. त्यासाठी तलावाची उंची २.७० मीटरने वाढवून आसोलामेंढा कालव्याची वहन क्षमता १.७ क्युमेक्स करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे ५४ हजार ८७९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाची सिंचन क्षमता जुलै २०१९ पर्यंत १५ हजार ९७९ हेक्टर आहे. आसोलामेंढा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये ११ गावे येतात. बुडीत गावांचे पुनर्वसन केल्या जाणार आहे. यासाठी १४.३३ हेक्टर आर. जागा ताब्यात घेण्यात आली.असे होईल विस्तारीकरणआसोलामेंढा प्रकल्पाचा मुख्य कालवा ४१.३७ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये ३ शाखा कालवे, २० वितरीका, ४२ लघु कालवे व २१ थेट विमोचके असणार आहे. आसोलामेंढा प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम असल्याने वाढीव क्षेत्राकरिता नुतनीकरण केले जात आहे. सन २०१९-२० या वर्षात पूर्ण लाभक्षेत्राची सिंचन क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावरील ९९ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात साठविल्या जाईल. याकरिता तलावाची उंची २.७० मीटरने वाढणार आहे. परिणामी, आसालोमेंढा प्रकल्पामुळे ८२ गावांत जलसमृद्धी येणार आहे.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरणagricultureशेती