शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:23 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांची पायपीट : गावातील टाकी शोभेची

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावात दहा वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना अद्यापही नळाचे पाणी मिळत नसल्याने चकघोसरी वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चकघोसरी येथे एक हजारच्या जवळपास लोकवस्ती असून गावात चार विहिरी व चार बोरवेल आहेत. मात्र काहींचे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान भागवणारा हातपंप आठवडा भरापूर्वी बिघडला. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली. ग्रा.पं. सदस्यांना कळविले असता. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.चकघोसरी गावात अद्यापही नळ योजना पुर्णत्वास आलेली नाही. जवळपास दहा वर्षापूर्वी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावाकरिता असलेल्या योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून गावात २० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या आशेने नळ जोडणी केली. मात्र अल्पावधीतच पाणी पुरवठा ठप्प पडला. दहा वर्षे लोटूनही हा पाणी पुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.चकघोसरी गावाच्या सीमेवरुन अर्धा किमी अंतरावर उमा नदी वाहते. या नदीतून शेतकरी तीन किलोमिटर पर्यंत शेतीला पाणी करतात. तर चकघोसरी गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करुन गावाच्या टाकीत पाणी का पोहचविले जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.गावताील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. यात नदी, नाल्याचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन गावकºयांची पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई