शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:23 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांची पायपीट : गावातील टाकी शोभेची

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावात दहा वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना अद्यापही नळाचे पाणी मिळत नसल्याने चकघोसरी वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चकघोसरी येथे एक हजारच्या जवळपास लोकवस्ती असून गावात चार विहिरी व चार बोरवेल आहेत. मात्र काहींचे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान भागवणारा हातपंप आठवडा भरापूर्वी बिघडला. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली. ग्रा.पं. सदस्यांना कळविले असता. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.चकघोसरी गावात अद्यापही नळ योजना पुर्णत्वास आलेली नाही. जवळपास दहा वर्षापूर्वी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावाकरिता असलेल्या योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून गावात २० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या आशेने नळ जोडणी केली. मात्र अल्पावधीतच पाणी पुरवठा ठप्प पडला. दहा वर्षे लोटूनही हा पाणी पुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.चकघोसरी गावाच्या सीमेवरुन अर्धा किमी अंतरावर उमा नदी वाहते. या नदीतून शेतकरी तीन किलोमिटर पर्यंत शेतीला पाणी करतात. तर चकघोसरी गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करुन गावाच्या टाकीत पाणी का पोहचविले जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.गावताील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. यात नदी, नाल्याचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन गावकºयांची पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई