शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

चक घोसरीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:23 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांची पायपीट : गावातील टाकी शोभेची

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चकघोसरी गावात पाणी समस्या बिकट बनली आहे. गावातील बुद्ध विहाराजवळील मुख्य हातपंप बंद पडल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावात दहा वर्षापूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना अद्यापही नळाचे पाणी मिळत नसल्याने चकघोसरी वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चकघोसरी येथे एक हजारच्या जवळपास लोकवस्ती असून गावात चार विहिरी व चार बोरवेल आहेत. मात्र काहींचे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान भागवणारा हातपंप आठवडा भरापूर्वी बिघडला. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार केली. ग्रा.पं. सदस्यांना कळविले असता. मात्र हातपंप दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याऐवजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे.चकघोसरी गावात अद्यापही नळ योजना पुर्णत्वास आलेली नाही. जवळपास दहा वर्षापूर्वी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावाकरिता असलेल्या योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून गावात २० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या आशेने नळ जोडणी केली. मात्र अल्पावधीतच पाणी पुरवठा ठप्प पडला. दहा वर्षे लोटूनही हा पाणी पुरवठा सुरु करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.चकघोसरी गावाच्या सीमेवरुन अर्धा किमी अंतरावर उमा नदी वाहते. या नदीतून शेतकरी तीन किलोमिटर पर्यंत शेतीला पाणी करतात. तर चकघोसरी गावासाठी स्वतंत्र नळ योजना मंजूर करुन गावाच्या टाकीत पाणी का पोहचविले जात नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.गावताील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. यात नदी, नाल्याचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन गावकºयांची पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई