शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

टरबूज शेतीमुळे उद्भवणार पाणी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:04 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख देवाडा खुर्द गावाची ओळख आहे.

ठळक मुद्देदेवाडा खुर्द येथील प्रकार : अंधारी नदीवर परप्रांतीयांकडून शंभर एकरात शेती

आॅनलाईन लोकमतपोंभुर्णा : तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख देवाडा खुर्द गावाची ओळख आहे. या गावालगतच्या अंधारी नदी पात्रालगत परप्रांतीय व्यक्तींनी टरबूज शेतीची लागवड केली आहे. नदी पात्रातील पाणी टरबुज शेतीला दिले जात असल्याने गावकºयांना पिण्याच्या पाणी समस्येला सामोरे जावे लागण्याची पाळी आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावामध्ये पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने या गावात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्येच पाण्याची टंचाई भासत असते. गावातील अनेक विहिरी पाण्याविना कोरड्या पडतात. येथील हातपंप सुद्धा बंद पडतात. त्यामुळे स्थानिक नागरिक बैलबंडीद्वारे शेतशिवारातील विहिरीतील पाणी आणून आपली समस्या सोडवितात.गावामध्ये पाण्याची टाकी असून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अंधारी नदीच्या पात्रातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जोपर्यंत नदीच्या पात्रात पाणी असते, तोपर्यंत नळाद्वारे पाणी दिले जाते. नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत दरवर्षी सिमेंटच्या खाली बॅगमध्ये रेती भरुन बंधारा बांधण्यात येतो. त्यामुळे काही प्रमाणात गावाला पाण्याची सोय होते. परंतु, मागील वर्षीपासून देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायतीची कुठलीही परवाणगी न घेता परप्रांतीय व्यक्तींनी अंधारी नदीच्या काठावर असलेल्या १०० एकरच्यावर शेतीमध्ये टरबूज शेतीची लागवड करीत आहेत. या शेतीला अंधारी नदीच्या पात्रातील पाणी दिले जात आहे. परंतु सद्यास्थितीत नदीच्या पात्रातील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे संबंधीत टरबूज शेतीधारक आणि बागायत शेतीधारक त्या ठिकाणावरुन नेहमी पाण्याचा वापर करीत राहिल्यास देवाडा खुर्द वासीयांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरपास्त होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. देवाडा खुर्द येथे दरवर्षी पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा या परप्रांतीय टरबूज शेती व्यवसायीकांनी पाणी करण्याची परवानगी आणि विद्युत पुरवठ्याची परवानगी कुणी दिली, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन स्थानिक नागरिकांना भविष्यात पाणी विषयक समस्या जाणवणार नाही यासाठी ठोस पर्यायी योजना त्वरीत उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन या तांत्रीक युगात दरवर्षी नदीवर बंधारा बांधण्याची पाळी येणार नाही, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याची मागणीपोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द हे गाव सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख असून सदर गाव पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील आहे. पालकमंत्र्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये एटीएमद्वारे शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु देवाडा खुर्द या गावात गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक अंधारी नदीच्या पात्रातील अशुद्ध असे गढूळ पाणी पितात. नदीच्या पात्रातील पाणी संपले तर शेतशिवारातील विहिरीतील, तलावातील पाणी पितात. त्यांना शुद्ध पाणी तर सोडा अशुद्ध व गढूळ पाणी शुद्ध उन्हाळ्यामध्ये मिळत नाही. दरवर्षी नदी पात्रामध्ये बंधारा बांधून त्यात अडविलेल्या पाण्यावर आपली तहाण भागवावी लागत असते. तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जनावरे पितात, म्हशी पाण्यात बसतात. त्यांचा मलमत्रु तिथे साचतो. अंत्यविधीही तिथेच केली जाते. तरीही तेच पाणी गावात पुरवठा केला जात असल्याने हेच पाणी गावकरी पितात, असे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा सर्व प्रकार संबंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यानी जाता येता बघतात. परंतु, यावर कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे गावकºयांत रोष असून गावकºयांना शुद्ध पाणी देण्याची मागणी होत आहे.