शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पाऊचमधील पाणी आरोग्यासाठी घातक

By admin | Updated: May 22, 2015 01:24 IST

बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही.

चंद्रपूर : बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या पाण्याच्या पाऊचवर कुठेही बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद केली जात नाही. प्लास्टिकमध्ये बंद केलेले पाणी किती दिवस वापरता येते, याचेही निकष नाहीत. त्यामुळे पाऊचमधील पाणी मानवी आरोग्यासाठी धोक्याचे ठरत आहे. उन्हाची तीव्रता वाढली की पाणीटंचाईला सुरूवात होते. स्वच्छ पाण्याची उपलब्धता होत नसल्याने उन्हाळ्यात बाहेर फिरायला निघाल्यानंतर पाणी विकत घेऊन पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. यात मिनरल वॉटर, ड्रिकींग वॉटर या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या या बाटलीबंद पाण्याची मोठयÞा प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा पैसा करण्याचा व्यवसाय चांगलाच वाढीस लागल्याचेही दिसून येत आहे.एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत १५ ते २० रु पये आहे. गत काही दिवसांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्यांनीही बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भारतात पाणीही विकले जाते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून लहान-मोठयÞा कंपन्या बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसते. शहरात अनेक ठिकाणी पाणपोई असतानाही दुकानातून मिनरल वॉटरची विक्र ी होत आहे. प्रवाशीही आता बसस्थानकावर पाणपोईपेक्षा आरोग्याकरिता २० रुपयांची बॉटल विकत घेऊन आपली तहान भागविताना दिसतात; पण हे पाणी आरोग्याकरिता किती योग्य आहे, याची शहानिशा कुणीही करीत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)