शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:52 IST

येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देएकमेकांना मारहाण : मडके फोडून ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.भिसी येथे ३६५ दिवसांतून केवळ ८० दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नळयोजनेचा कर दुप्पट झाला तरी सलग १६ दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. नेहमी ४ ते ५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यावेळी १६ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर तुटून पडले.यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक झामरे यांनी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता.साहित्याची नासधूसमहिलांनी सरपंच योगिता गोहणे यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या, काचेचे ग्लास व इतर साहित्याची तोडफोड केली. काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजन आणले होते. ते तिथेच फोडून संताप व्यक्त केला.परस्परांविरुद्ध मारहाणीची तक्रारयावेळी मालूबाई श्रावण काळे व इतर महिलांनी सरपंच गोहणे यांना टँकरने पाणी द्या, नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, जमत नसेल तर राजीनामा द्या, असा प्रश्नांचा भडिमार केला. यावरून गोहणे यांचा पारा भडकला व त्यांनी मालूबाई काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उपस्थित जनता अधिकच भडकली. मालूबाई काळेला सोबत घेऊन जनतेने मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. मालू काळे यांनी पोलिसात सरपंच गोहणे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याचवेळी गोहणे यांनी मालू काळे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला.ग्राम विकास अधिकाऱ्यांनाही घेरावसकाळी १०.३० वाजता भिसीचे ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे ग्रामपंचायतीत आले. दाराला कुलूप व चपलांचा हार बघून ते भांबावले. लगेच नागरिकांनी त्यांनाही घेरले व पाणीप्रश्नावरून जाब विचारला. निवडणुकीच्या कामासाठी आठ दिवस शेंडे बाहेर होते. भिसीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. पण अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे म्हणाले की, दोन महिन्यांपासून मी बीडीओकडे जनरेटर खरेदी करण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे. पण चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे व बिडीओ जाधव यांनी सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रयत्न करूनही मला भिसीचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.