शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:52 IST

येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देएकमेकांना मारहाण : मडके फोडून ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.भिसी येथे ३६५ दिवसांतून केवळ ८० दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नळयोजनेचा कर दुप्पट झाला तरी सलग १६ दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. नेहमी ४ ते ५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यावेळी १६ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर तुटून पडले.यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक झामरे यांनी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता.साहित्याची नासधूसमहिलांनी सरपंच योगिता गोहणे यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या, काचेचे ग्लास व इतर साहित्याची तोडफोड केली. काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजन आणले होते. ते तिथेच फोडून संताप व्यक्त केला.परस्परांविरुद्ध मारहाणीची तक्रारयावेळी मालूबाई श्रावण काळे व इतर महिलांनी सरपंच गोहणे यांना टँकरने पाणी द्या, नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, जमत नसेल तर राजीनामा द्या, असा प्रश्नांचा भडिमार केला. यावरून गोहणे यांचा पारा भडकला व त्यांनी मालूबाई काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उपस्थित जनता अधिकच भडकली. मालूबाई काळेला सोबत घेऊन जनतेने मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. मालू काळे यांनी पोलिसात सरपंच गोहणे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याचवेळी गोहणे यांनी मालू काळे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला.ग्राम विकास अधिकाऱ्यांनाही घेरावसकाळी १०.३० वाजता भिसीचे ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे ग्रामपंचायतीत आले. दाराला कुलूप व चपलांचा हार बघून ते भांबावले. लगेच नागरिकांनी त्यांनाही घेरले व पाणीप्रश्नावरून जाब विचारला. निवडणुकीच्या कामासाठी आठ दिवस शेंडे बाहेर होते. भिसीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. पण अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे म्हणाले की, दोन महिन्यांपासून मी बीडीओकडे जनरेटर खरेदी करण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे. पण चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे व बिडीओ जाधव यांनी सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रयत्न करूनही मला भिसीचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.