शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:52 IST

येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देएकमेकांना मारहाण : मडके फोडून ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.भिसी येथे ३६५ दिवसांतून केवळ ८० दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नळयोजनेचा कर दुप्पट झाला तरी सलग १६ दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. नेहमी ४ ते ५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यावेळी १६ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर तुटून पडले.यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक झामरे यांनी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता.साहित्याची नासधूसमहिलांनी सरपंच योगिता गोहणे यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या, काचेचे ग्लास व इतर साहित्याची तोडफोड केली. काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजन आणले होते. ते तिथेच फोडून संताप व्यक्त केला.परस्परांविरुद्ध मारहाणीची तक्रारयावेळी मालूबाई श्रावण काळे व इतर महिलांनी सरपंच गोहणे यांना टँकरने पाणी द्या, नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, जमत नसेल तर राजीनामा द्या, असा प्रश्नांचा भडिमार केला. यावरून गोहणे यांचा पारा भडकला व त्यांनी मालूबाई काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उपस्थित जनता अधिकच भडकली. मालूबाई काळेला सोबत घेऊन जनतेने मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. मालू काळे यांनी पोलिसात सरपंच गोहणे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याचवेळी गोहणे यांनी मालू काळे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला.ग्राम विकास अधिकाऱ्यांनाही घेरावसकाळी १०.३० वाजता भिसीचे ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे ग्रामपंचायतीत आले. दाराला कुलूप व चपलांचा हार बघून ते भांबावले. लगेच नागरिकांनी त्यांनाही घेरले व पाणीप्रश्नावरून जाब विचारला. निवडणुकीच्या कामासाठी आठ दिवस शेंडे बाहेर होते. भिसीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. पण अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे म्हणाले की, दोन महिन्यांपासून मी बीडीओकडे जनरेटर खरेदी करण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे. पण चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे व बिडीओ जाधव यांनी सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रयत्न करूनही मला भिसीचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.