शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

राजुरा तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 31, 2014 23:22 IST

राजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात

बी.यू.बोर्डेवार - राजुराराजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाला. मागील १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कालव्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाटापर्यंत अजुनही पाणी पोहचले नाही. भेंडाळा प्रकल्पाचे पाणीसुद्धा नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे राजुरा तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. राजुरा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु निकृष्ट बांधकामामुळे गावातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. अनेक गावातील बोअरिंग बंद असून लक्कडकोट, सिंधी, नदी पट्टयातील चार्ली, निर्लर्ीेसारख्या गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलि व कोलवाशरीज्मध्ये मोठय़ा प्रमाणात भूगर्भातील पाणी उपसा करण्यात येत असून या कंपन्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. सोन्डो परिसरात बोअरिंग मारले तरी पाणी लागत नसून शेतकर्‍यांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा शहरातील निजामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात येत असल्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. या तलावाच्या संवर्धनासाठी आठ करोड रुपये खर्च करण्यात येत असून राजुरा तालुक्यातील मूर्ती कोलाम गुड्यामध्येसुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील नदी, नाले पूर्णत:  आटले असून माणसाबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा बिकट झाला आहे.राजुरा तालुक्यात पाणी टंचाईवर मात करता यावी, यासाठी उन्हाळ्यापूर्वीच राजुराचे आ. सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकार्‍यांशी पाणी टंचाईवर सविस्तर चर्चा करून राजुरा तालुक्यासह राजुरा विधानसभा क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकार्‍याना निर्देश देण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्यासाठी आदिवासीबहुल क्षेत्रातील नागरिकांना पायपीट करावी लागत असून अनेक गावातील विहिरीचे पाणीसुद्धा आटत चालले आहे. या सर्व परिस्थितीमुळे अनेक गावांतील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर पोहोचला आहे. या तीव्र उन्हात या भागातील नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. पाण्यासाठी भविष्यात कसे नियोजन करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.