शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

राजुरा तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 31, 2014 23:22 IST

राजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात

बी.यू.बोर्डेवार - राजुराराजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात मुबलक पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील डोंगरगाव सिंचन प्रकल्पावर करोडो रुपये खर्च झाला. मागील १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कालव्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पाटापर्यंत अजुनही पाणी पोहचले नाही. भेंडाळा प्रकल्पाचे पाणीसुद्धा नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे राजुरा तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. राजुरा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु निकृष्ट बांधकामामुळे गावातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. अनेक गावातील बोअरिंग बंद असून लक्कडकोट, सिंधी, नदी पट्टयातील चार्ली, निर्लर्ीेसारख्या गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलि व कोलवाशरीज्मध्ये मोठय़ा प्रमाणात भूगर्भातील पाणी उपसा करण्यात येत असून या कंपन्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. सोन्डो परिसरात बोअरिंग मारले तरी पाणी लागत नसून शेतकर्‍यांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा शहरातील निजामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात येत असल्यामुळे शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. या तलावाच्या संवर्धनासाठी आठ करोड रुपये खर्च करण्यात येत असून राजुरा तालुक्यातील मूर्ती कोलाम गुड्यामध्येसुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील नदी, नाले पूर्णत:  आटले असून माणसाबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा बिकट झाला आहे.राजुरा तालुक्यात पाणी टंचाईवर मात करता यावी, यासाठी उन्हाळ्यापूर्वीच राजुराचे आ. सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकार्‍यांशी पाणी टंचाईवर सविस्तर चर्चा करून राजुरा तालुक्यासह राजुरा विधानसभा क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकार्‍याना निर्देश देण्यात आले. राजुरा विधानसभा क्षेत्रात पाण्यासाठी आदिवासीबहुल क्षेत्रातील नागरिकांना पायपीट करावी लागत असून अनेक गावातील विहिरीचे पाणीसुद्धा आटत चालले आहे. या सर्व परिस्थितीमुळे अनेक गावांतील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर पोहोचला आहे. या तीव्र उन्हात या भागातील नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. पाण्यासाठी भविष्यात कसे नियोजन करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.