शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांवर पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:31 IST

यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे.

ठळक मुद्देकेवळ २८.८६ टक्के पाणी : इरई धरणात अत्यल्प जलसाठा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांची तहान भागविणे मनपासमोर मोठे आव्हान आहे. याबाबत आता महानगरपालिका कोणती उपाययोजना करते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.यंदा जोरदार पर्जन्यमान होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेले. जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस दिसलाच नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी आहे. मात्र पावसाने सरासरी गाठणे तर सोडाच सरासरीच्या निम्म्यावरही पाऊस पोहचला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूण जिल्ह्यावर यंदा भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. या सर्व लोकांची तहान भागविण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे एकमेव इरई धरण हेच पाण्याचे स्रोत आहे. याच धरणातून पाण्याची उचल करीत चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे इरई धरणात मुबलक जलसाठा जमा होऊ शकला नाही. त्यामुळे धरणाची स्थिती आता हिवाळ्यातच चिंताजनक झाली आहे. या धरणात सध्या केवळ २८.८६ टक्केच पाणी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी चंद्रपूरकरांना कसे पुरेल, हा प्रश्न आहे. याशिवाय पावसाचे आगमन जून, जुलै या महिन्यात होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात चंद्रपुरात सूर्य आग ओकतो, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे इरई धरणातील पाणी या महिन्यात चंद्रपूरकरांना मिळणे कठीण दिसत आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.वीज निर्मितीवरही संकटपाण्यासोबत सध्या वीजही मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. दोन्ही घटकांची पावलोपावली गरज भासते. पाण्याशिवाय मानवाचे भागत नाही, हे खरे असले तरी आजकाल विजेशिवायही मनुष्याचे भागत नाही, हेदेखील नाकारता येत नाही. मात्र हे दोन्ही घटक सध्या संकटात सापडले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही वीज निर्मितीसाठी इरई धरणातूनच पाणी घ्यावे लागते. वीज केंद्र या धरणातून सातत्याने पाण्याचा उपसा करीत राहिले तर पाणी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे वीज केंद्राने आपले काही संच बंद करून चंद्रपूरकरांसाठी पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. मनपाचीही तशी इच्छा आहे. मात्र असे झाले तर उत्पादन कमी होऊन वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.मनपाकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा?भविष्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेकडूनही पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. १ फेब्रुवारीपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती घेण्याकरिता महापौर अंजली घोटेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.