शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

चंद्रपूरकरांवर पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:31 IST

यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे.

ठळक मुद्देकेवळ २८.८६ टक्के पाणी : इरई धरणात अत्यल्प जलसाठा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांची तहान भागविणे मनपासमोर मोठे आव्हान आहे. याबाबत आता महानगरपालिका कोणती उपाययोजना करते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.यंदा जोरदार पर्जन्यमान होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेले. जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस दिसलाच नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी आहे. मात्र पावसाने सरासरी गाठणे तर सोडाच सरासरीच्या निम्म्यावरही पाऊस पोहचला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूण जिल्ह्यावर यंदा भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. या सर्व लोकांची तहान भागविण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे एकमेव इरई धरण हेच पाण्याचे स्रोत आहे. याच धरणातून पाण्याची उचल करीत चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे इरई धरणात मुबलक जलसाठा जमा होऊ शकला नाही. त्यामुळे धरणाची स्थिती आता हिवाळ्यातच चिंताजनक झाली आहे. या धरणात सध्या केवळ २८.८६ टक्केच पाणी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी चंद्रपूरकरांना कसे पुरेल, हा प्रश्न आहे. याशिवाय पावसाचे आगमन जून, जुलै या महिन्यात होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात चंद्रपुरात सूर्य आग ओकतो, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे इरई धरणातील पाणी या महिन्यात चंद्रपूरकरांना मिळणे कठीण दिसत आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.वीज निर्मितीवरही संकटपाण्यासोबत सध्या वीजही मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. दोन्ही घटकांची पावलोपावली गरज भासते. पाण्याशिवाय मानवाचे भागत नाही, हे खरे असले तरी आजकाल विजेशिवायही मनुष्याचे भागत नाही, हेदेखील नाकारता येत नाही. मात्र हे दोन्ही घटक सध्या संकटात सापडले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही वीज निर्मितीसाठी इरई धरणातूनच पाणी घ्यावे लागते. वीज केंद्र या धरणातून सातत्याने पाण्याचा उपसा करीत राहिले तर पाणी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे वीज केंद्राने आपले काही संच बंद करून चंद्रपूरकरांसाठी पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. मनपाचीही तशी इच्छा आहे. मात्र असे झाले तर उत्पादन कमी होऊन वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.मनपाकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा?भविष्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेकडूनही पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. १ फेब्रुवारीपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती घेण्याकरिता महापौर अंजली घोटेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.