शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील भेंडा या धरणातील पाणी वर्धा नदीमध्ये सोडल्यानंतर वरोरा शहरवासीयांना मिळणार आहे. भेंंडा धरण वरोरानजिकच्या वर्धा नदीचे पात्र ११५ किलोमिटर अंतर असून हे अंतर पार करीत वर्धा नदीपर्यंत पाणी पोहचणार आहे.वरोरा शहराला लगतच्या तुळाना गावालगतच्या वर्धा नदीच्या पात्रातून शुद्ध पाणी मिळत असे. सध्या वर्धा नदीत पाण्याचा ठणठणाट असून पाणी पुरवठा यंत्राजवळील नदीची धार आटली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा नदीमध्ये अप्पर वर्धा, लाल पोथरा धरणाचे पाणी सोडून उन्हाळ्यात वरोरावासियांची तहान भागविली जाते. हा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसात मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी या धरणात पाणी साठा पुरेसा नसल्याने प्रशासनाने या धरणातून पाणी सोडण्यास नकार दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामध्ये वरोरा शहरासह २५ गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरोरा शहरासह २५ गावांंना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. वर्धा नदीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रवाह धरणातून सोडला जातो.सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे आरक्षित केलेले पाणी कधीपर्यंत पोहचणार व ते नागरिकांना कधी मिळणार, हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. उन्हाळा संपायला जवळपास २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)