शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील भेंडा या धरणातील पाणी वर्धा नदीमध्ये सोडल्यानंतर वरोरा शहरवासीयांना मिळणार आहे. भेंंडा धरण वरोरानजिकच्या वर्धा नदीचे पात्र ११५ किलोमिटर अंतर असून हे अंतर पार करीत वर्धा नदीपर्यंत पाणी पोहचणार आहे.वरोरा शहराला लगतच्या तुळाना गावालगतच्या वर्धा नदीच्या पात्रातून शुद्ध पाणी मिळत असे. सध्या वर्धा नदीत पाण्याचा ठणठणाट असून पाणी पुरवठा यंत्राजवळील नदीची धार आटली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा नदीमध्ये अप्पर वर्धा, लाल पोथरा धरणाचे पाणी सोडून उन्हाळ्यात वरोरावासियांची तहान भागविली जाते. हा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसात मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी या धरणात पाणी साठा पुरेसा नसल्याने प्रशासनाने या धरणातून पाणी सोडण्यास नकार दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामध्ये वरोरा शहरासह २५ गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरोरा शहरासह २५ गावांंना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. वर्धा नदीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रवाह धरणातून सोडला जातो.सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे आरक्षित केलेले पाणी कधीपर्यंत पोहचणार व ते नागरिकांना कधी मिळणार, हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. उन्हाळा संपायला जवळपास २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)