शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील भेंडा या धरणातील पाणी वर्धा नदीमध्ये सोडल्यानंतर वरोरा शहरवासीयांना मिळणार आहे. भेंंडा धरण वरोरानजिकच्या वर्धा नदीचे पात्र ११५ किलोमिटर अंतर असून हे अंतर पार करीत वर्धा नदीपर्यंत पाणी पोहचणार आहे.वरोरा शहराला लगतच्या तुळाना गावालगतच्या वर्धा नदीच्या पात्रातून शुद्ध पाणी मिळत असे. सध्या वर्धा नदीत पाण्याचा ठणठणाट असून पाणी पुरवठा यंत्राजवळील नदीची धार आटली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा नदीमध्ये अप्पर वर्धा, लाल पोथरा धरणाचे पाणी सोडून उन्हाळ्यात वरोरावासियांची तहान भागविली जाते. हा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसात मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी या धरणात पाणी साठा पुरेसा नसल्याने प्रशासनाने या धरणातून पाणी सोडण्यास नकार दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामध्ये वरोरा शहरासह २५ गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरोरा शहरासह २५ गावांंना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. वर्धा नदीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रवाह धरणातून सोडला जातो.सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे आरक्षित केलेले पाणी कधीपर्यंत पोहचणार व ते नागरिकांना कधी मिळणार, हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. उन्हाळा संपायला जवळपास २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)