शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांमध्ये लागले वॉटर एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:36 IST

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्यात येतील. हा मतदार संघ अशा पध्दतीने नागरिकांना शुद्ध पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्दीकरण संयंत्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी जेव्हा आपण या परिसरात आलो असता, वेकोलिच्या कॉलनीत शुद्ध पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याचवेळी आपण प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याचा संकल्प केला होता. पहिल्या टप्प्यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना लोकार्पित केली. मूल आणि बल्लारपूर तालुक्यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रूपये खर्च करून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करीत आहोत. त्यानंतर मूल तालुक्यातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्याचा पहिला प्रयोग केला. तेथील सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गावातील ९५ टक्के आजार संपुष्टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्यामागील प्रमुख कारण अशुद्ध पाणी आहे. म्हणूनच या मतदार संघातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्याचा संकल्प आपण केला, असे त्यांनी सांगितले.ही संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना दिली जाणार आहेत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड दिले जाईल. पुढील टप्प्यात बल्लारपूर तालुक्यात वेकोलिच्या माध्यमातून २९ ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्र बसविणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुगार्पूरातील वॉर्ड नं. २ आझाद चौक, वेकोलि कॉलनी, लखमापूर या ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. अन्य ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.या गावांना मिळणार शुद्ध पाणीवेकोलि दुगार्पूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुगार्पूर वार्ड क्र. १, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगाव, आंभोरा, वरवट, अडेगाव, चिचपल्ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगाव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुगार्पूर वॉर्ड क्र. २ येथील आझाद चौक, लखमापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्दीकरण संयंत्रे लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार