शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय चमूचा स्वच्छतेवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:15 IST

स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात फिरताहेत चमूतील सदस्य

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. या चमूतील सदस्य चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात जाऊन स्वच्छतेचा आढावा घेत आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसा फिडबॅक लगेच केंद्राकडे पाठविला जात आहे.केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेत उतरून चंद्रपूर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविणे सुरू केले आहे. ठिकठिकाणी कचरा पेट्या लावल्या आहेत. घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे.हातगाडी, ठेले व किरकोळ व्यावसायिकांना कचरा डब्यांचे वाटप केले आहे. ठिकठिकाणी सुलभ सार्वजनिक मुताºया व शौचालय उपलब्ध केले आहेत. दरम्यान, या शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील एक चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. सात ते आठ जण या चमूत आहेत. बुधवारी यातील एक अधिकाºयांनी महापालिकेत जाऊन या उपक्रमाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली. मनपातील एकाही अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क न साधता ही चमू स्वतंत्रपणे शहरातील वॉर्डावॉर्डात फिरून आढावा घेत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच चमूतील दोन-दोन अधिकारी वेगवेगळ्या प्रभागात फिरले. ही चमू आणखी शनिवारी चंद्रपुरातच थांबणार असल्याची माहिती आहे.नागरिकांशी थेट संवादकेंद्रीय चमूतील दोन-दोन सदस्य एकेका वॉर्डात फिरत आहेत. तेथे जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. वॉर्डात कितीवेळा झाडू फिरविला जातो, स्वच्छता कर्मचारी नियमित वॉर्डात येतात का, चंद्रपूर पूर्वीपेक्षा स्वच्छ झाले का, सार्वजनिक मुताºया, शौचालयांची व्यवस्था आहे का, यासारखे प्रश्न विचारले जात आहे. नागरिकांच्या उत्तरावरून हे सदस्य आपला अहवाल तयार करीत आहेत.ताबडतोब फिडबॅक पाठविला जातोयकेंद्र शासनाकडून आलेली ही चमू चंद्रपुरातील वॉर्डात फिरून स्वच्छतेसंबंधित छायाचित्र काढत आहेत. त्यानंतर नागरिकांशी संवाद साधत आहेत. आणि छायाचित्र आणि नागरिकांशी बोलून मिळविलेली माहिती ताबडतोब लॅपटापच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठविली जात आहे.