शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

केंद्रीय चमूचा स्वच्छतेवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:15 IST

स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात फिरताहेत चमूतील सदस्य

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्वच्छता अभियानात चंद्रपूरची सध्या देशातील काही नामांकित शहराशी स्पर्धा सुरू आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत एक केंद्रीय चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. या चमूतील सदस्य चंद्रपुरातील वॉर्डावॉर्डात जाऊन स्वच्छतेचा आढावा घेत आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसा फिडबॅक लगेच केंद्राकडे पाठविला जात आहे.केंद्राच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेत उतरून चंद्रपूर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविणे सुरू केले आहे. ठिकठिकाणी कचरा पेट्या लावल्या आहेत. घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे.हातगाडी, ठेले व किरकोळ व्यावसायिकांना कचरा डब्यांचे वाटप केले आहे. ठिकठिकाणी सुलभ सार्वजनिक मुताºया व शौचालय उपलब्ध केले आहेत. दरम्यान, या शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील एक चमू गुरुवारी चंद्रपुरात दाखल झाली. सात ते आठ जण या चमूत आहेत. बुधवारी यातील एक अधिकाºयांनी महापालिकेत जाऊन या उपक्रमाबाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली. मनपातील एकाही अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क न साधता ही चमू स्वतंत्रपणे शहरातील वॉर्डावॉर्डात फिरून आढावा घेत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच चमूतील दोन-दोन अधिकारी वेगवेगळ्या प्रभागात फिरले. ही चमू आणखी शनिवारी चंद्रपुरातच थांबणार असल्याची माहिती आहे.नागरिकांशी थेट संवादकेंद्रीय चमूतील दोन-दोन सदस्य एकेका वॉर्डात फिरत आहेत. तेथे जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. वॉर्डात कितीवेळा झाडू फिरविला जातो, स्वच्छता कर्मचारी नियमित वॉर्डात येतात का, चंद्रपूर पूर्वीपेक्षा स्वच्छ झाले का, सार्वजनिक मुताºया, शौचालयांची व्यवस्था आहे का, यासारखे प्रश्न विचारले जात आहे. नागरिकांच्या उत्तरावरून हे सदस्य आपला अहवाल तयार करीत आहेत.ताबडतोब फिडबॅक पाठविला जातोयकेंद्र शासनाकडून आलेली ही चमू चंद्रपुरातील वॉर्डात फिरून स्वच्छतेसंबंधित छायाचित्र काढत आहेत. त्यानंतर नागरिकांशी संवाद साधत आहेत. आणि छायाचित्र आणि नागरिकांशी बोलून मिळविलेली माहिती ताबडतोब लॅपटापच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठविली जात आहे.