शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा आमदाराचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:11 IST

जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देभारनियमन बंद करा : कृषिपंपांना तत्काळ वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता योजनेअंतर्गत १९ निविदा काढण्यात आल्या. परंतु त्यात दोन लाख ५० हजारांपर्यंत ज्यांचा विद्युतीकरणाचा खर्च असेल, त्यांनाच या योजने अंतर्गत वीज पुरवठा मिळणार आहे, असे ऐकिवात असल्याचे आ. बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. परंतु ज्यांच्या विद्युतीकरणाचा खर्च दोन लाख ५० हजाराच्या वर जातो, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडणीबाबत काय उपाययोजना केल्या आहे आणि सदर निविदा या फक्त ३१ मार्च २०१८ पूर्वी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना लागू होत आहे. तर मग त्यांच्या नंतरच्या डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे? किंवा त्यांच्या कृषिपंपाचे विद्युतीकरण केव्हा करणार, असा सवाल आ. धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.मागील सात महिन्यांपासून कृषिपंपासाठी दिली जाणारी डिमांड मिळत नाही आहे, याचे कारण स्पष्ट करावे व कृषिपंप शेतकऱ्यांना वीज पुरवठा हा २४ तास करण्यात यावा. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषिपंपास विद्युत पुरवठा देण्यात यावा. थ्री फेज व सिंगल फेजचे मीटर वीज वितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, रमेश तिवारी, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, सोहेल शेख, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, सिक्की यादव, सुरेश पचारे, मनोज पाल व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना थ्री फेज वीज द्या - मुनगंटीवारचंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचे अस्तित्व असल्याने रात्रीच्या वेळी शेतामध्ये ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना धोका पत्करावा लागतो. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये दिवसा थ्री फेज वीज पुरवठा कृषिपंपांना देण्याची मागणी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य केली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना हा फार मोठा दिलासा आहे.