शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

धानपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात रात्रभर भटकंती

By admin | Updated: October 19, 2015 01:41 IST

पाऊस पूर्णत: गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग उदास झालेला असून शेतात पाणी देण्यासाठी काठी व घोंगडा घेऊन शेतकऱ्यांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे.

मारोडा : पाऊस पूर्णत: गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग उदास झालेला असून शेतात पाणी देण्यासाठी काठी व घोंगडा घेऊन शेतकऱ्यांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे.मारोडा हा परिसर तसा धानपीकांसाठी वाईट नाही. मूल शहरात धानाची बाजारपेठ आहे. मारोडा, उश्राळा, भादुर्णी, करवन, काटवन, कोसंबी, परझडी, सोमनाथ ही गावे सोमनाथची झरणं, उमा नदी व नलेश्वरच्या पाण्याने सुजलाम सुफलामच असतात. यास गाव तलावाची साथ मिळते. त्यामुळे मच्छीपालनातही अनेकजण गुंतले आहेत. परंतु त्यासाठी वरच्या पाण्याची गरज असते. मुबलक पाऊस दोन-चारदा पडला की उमा वाहू लागते. झरणं फुटू लागतात. यावर्षी तसे काही घडले नाही. उमा नदीला पूरच आला नाही. आलेल्या पावसामुळे झरणं ओसंडून वाहिली नाहीत. त्यामुळे शेताला पाणी कमी पडू लागलेला आहे. रात्रभर शेतकरी कुणी दुसरा चोरुन नेऊ नये म्हणून पाण्यासाठी हातात काठी व खांद्यावर घोंगडे घेऊन फिरत आहे. रात्रभर हे शेतकरी नलेश्वरच्या शेवटच्या कालव्याचे पाणी घेण्याकरिता अनेक मैल भटकत असतात. उमा कोरडी पडत आहेत. मोटारपंपाच्या फुटबालपर्यंत होडातून कालवे, खड्डे खोदलेले आहेत. लाखो रुपये गुंंतवून केलेल्या धानशेतीला जगविणे जीवन मरणाचा प्रश्न आहे. शासन स्थीर आहे. वरुणराजा रुसलेला आहे. अशा स्थितीत त्यांनी कोणाकडून न्याय मागावा, हा त्यांचा प्रश्न आहे. (वार्ताहर)