शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

धानपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात रात्रभर भटकंती

By admin | Updated: October 19, 2015 01:41 IST

पाऊस पूर्णत: गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग उदास झालेला असून शेतात पाणी देण्यासाठी काठी व घोंगडा घेऊन शेतकऱ्यांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे.

मारोडा : पाऊस पूर्णत: गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग उदास झालेला असून शेतात पाणी देण्यासाठी काठी व घोंगडा घेऊन शेतकऱ्यांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे.मारोडा हा परिसर तसा धानपीकांसाठी वाईट नाही. मूल शहरात धानाची बाजारपेठ आहे. मारोडा, उश्राळा, भादुर्णी, करवन, काटवन, कोसंबी, परझडी, सोमनाथ ही गावे सोमनाथची झरणं, उमा नदी व नलेश्वरच्या पाण्याने सुजलाम सुफलामच असतात. यास गाव तलावाची साथ मिळते. त्यामुळे मच्छीपालनातही अनेकजण गुंतले आहेत. परंतु त्यासाठी वरच्या पाण्याची गरज असते. मुबलक पाऊस दोन-चारदा पडला की उमा वाहू लागते. झरणं फुटू लागतात. यावर्षी तसे काही घडले नाही. उमा नदीला पूरच आला नाही. आलेल्या पावसामुळे झरणं ओसंडून वाहिली नाहीत. त्यामुळे शेताला पाणी कमी पडू लागलेला आहे. रात्रभर शेतकरी कुणी दुसरा चोरुन नेऊ नये म्हणून पाण्यासाठी हातात काठी व खांद्यावर घोंगडे घेऊन फिरत आहे. रात्रभर हे शेतकरी नलेश्वरच्या शेवटच्या कालव्याचे पाणी घेण्याकरिता अनेक मैल भटकत असतात. उमा कोरडी पडत आहेत. मोटारपंपाच्या फुटबालपर्यंत होडातून कालवे, खड्डे खोदलेले आहेत. लाखो रुपये गुंंतवून केलेल्या धानशेतीला जगविणे जीवन मरणाचा प्रश्न आहे. शासन स्थीर आहे. वरुणराजा रुसलेला आहे. अशा स्थितीत त्यांनी कोणाकडून न्याय मागावा, हा त्यांचा प्रश्न आहे. (वार्ताहर)