शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

साडेचार हजार शेतकऱ्यांना ‘फलोत्पादन’ सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:30 IST

एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला.

ठळक मुद्देयंदा सर्वाधिक आॅनलाईन नोंदणी : १९ कृषी योजनांच्या लाभासाठी वाढली स्पर्धा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला. त्यामुळे कृषी विभाग या योजनेची सोडत केव्हा काढणार, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहेत.एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत १९ कृषी प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. अनुदानित विविध योजनांच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज भरावे लागते. सामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फलोत्पादन यांत्रिकीकरण व पुष्पोत्पादन आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. यातील बहुतांश योजनांना १०० टक्के अनुदान आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने हॉर्टनेट या संगणक प्रणालीवर अर्ज भरणे कृषी विभागाने बंधनकारक केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात इंटरनेटची सुविधा नसताना ही आॅनलाईन पद्धत अन्यायकारक असल्याची टीका कृषी विभागावर झाली होती.परंतु, विविध योजनांद्वारे पारंपरिक शेती बदलेल आणि आधुनिक शेतीतून आर्थिक लाभ होईल, या आशेवर असणाºया ४ हजार ४५६ शेतकºयांनी विविध संकटे पार करून आॅनलाईन नोंदणी केली. अद्याप सोडत न निघाल्याने शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.अन्यथा योजना कागदावरचफलोत्पादन अभियान शेतकºयांना बळ देणारी आहे. अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची भूमिका परिणामकारक असली पाहिजे. अन्यथा आॅनलाईन अर्जाची पाचर मारलेल्या अनेक योजना कागदावरच राहतात, असा शेतकºयांचा आरोप आहे. या अभियान समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या लक्ष्यांकानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करताना पात्र शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.शेततळ्यांसाठी सर्वाधिक अर्जसामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला, फुलपिके लागवड साहित्य व निविष्ठा अनुदान मिळावे, याकरिता शेतकºयांनी अर्ज केला. मात्र, यामध्ये सामूहिक शेततळ्यांसाठी अर्ज करणाºयांची संख्या सर्वाधिक आहे.निधी खर्चात जिल्हा माघारलाएकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात प्राप्त रकमेतून ६४.५८ टक्के रक्कम खर्च झाले होते. २०१८-१९ चा वार्षिक कृती आराखडा १०१.५३ लाखांचा आहे. यातील १०० टक्के निधी कसा खर्च होईल, याचे नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी