शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

मागील वर्षीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST

मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला.

चंद्रपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदी-नाल्या शेजारील शेकडो हेक्टर पिकांची अतोनात हानी झाली. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन सर्व्हे करण्यात आला. नंतर पूरपीडितांना मदतही जाहीर करण्यात आली. तथापि, तालुक्यातील सोनुर्ली (गाडेगाव) येथील तब्बल ९३ शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित राहिल्याची बाब उजेडात आली आहे.तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गेल्या वर्षी पूरपीडितांचा सर्व्हे केला होता. यामध्ये सोनुर्ली (गाडेगाव) येथील ९३ शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरडून गेल्या. त्यावरील उभी पिके वाहून गेली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपणासही शासनाची मदत मिळेल, अशी आशा बाळगून होते. मात्र, अन्य गावातील शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर सोनुर्लीवासीयांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली.यासंदर्भात श्यामराव बांदूरकर, नारायण डायकी आणि अन्य शेतकऱ्यांनी कोरपना येथील तहसीलदारांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. तेव्हा दोन आठवड्यात ही मदत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मदत मिळालीच नाही.दरम्यान, १ आॅक्टोबरला येथील शेतकऱ्यांनी चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली. त्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदने दिली. या निवेदनाची दखल घेऊन ना.अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या गंभीर बाबीची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यावरून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आता कुणाकडे धाव घ्यायची असा प्रश्न येथील आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)