शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 14, 2015 01:15 IST

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे.

सुरेश रंगारी कोठारीबल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकामाधीन आहे. या योजनेस ८ नोव्हेंबर २०११ ला सन १९९९-२००० चे दरसूचीनुसार १९३१.५३ लक्ष साठी प्रशासकीय मान्यता व ३० जानेवारी २००९ ला सन २००८-०९ चे दरसुचीनुसार ७०३७.८८ लक्ष किमतीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास विदर्भ पाटबंधारे विभाग मंडळ नागपूरद्वारे मान्यता मिळाली. ११ डिसेंबर २०११ ला या योजनेच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ झाला. मात्र सध्याची कामाची स्थिती पाहता, उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होईल, हे सांगता येणे कठीण आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील हे सिंचन प्रकल्प एकमेव असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बल्लारपूर तालुक्यातील दहा गावे सुजलाम-सुफलाम होणार आहेत. या योजनेतून ३ हजार ६९९ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. या भागातील शेती केवळ निसर्गाच्या भरवश्यावर असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्या स्थितीत या योजनेच्या जॅलवेल, पंपहाऊस व उध्वनलिकेचे काम प्रततीपथावर आहे. तसेच उजवा व डावा मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यापैकी ४०० ते ५०० मिटर कालव्याचे काम शिल्लक आहे. या भागातील शेत जमीन उत्तम दर्जाची असून कोरडवाहू शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. गेली १५ वर्षांपासून या प्रकल्पाच्या लाभासाठी शेतकरी तळमळीत आहे. या प्रकल्पाच्या पंपहाऊस व जॅवेलचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पंपमशीन ४ बाय २८५ अशक्ती प्रकल्प ठिकाणी फिटींगसाठी आल्या आहेत. या प्रकल्पाला लागणारी विजेची कामे पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पामुळे खरीप २ हजार ३९८ हे व रब्बी १ हजार ३०१ हे शेती सिंचीत होणार आहे. अजूनपर्यंत या प्रकल्पाचा वितरण हौदाचे कामास सुरूवात झाली नाही. मात्र या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा दावा करीत आहेत.पळसगाव- आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे कामे येत्या जून-जुलैमध्ये पूर्ण होणार असून प्रकल्पात आवश्यक निधीचा पुरवठा वेळोवेळी होत आहे. कोणत्याही विभागाकडून प्रकल्पबाधीत होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. येत्या हंगामात प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत २० टक्के काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. कालव्याचेकाम निकृष्टया प्रकल्पाच्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक कामे अंदाजपत्रकात नमूद असल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे करण्यात आली नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला तरीही भविष्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ३९९८ हे असून बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोर्टीतुकूम, कोर्टीमक्ता, कळमना, आमडी व पळसगाव या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.