शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रकल्पग्रस्त दोन पिढ्यांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:22 IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देतत्काळ नोकºया द्या : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष वर्षानुवर्षापासून सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हस्तक्षेप करीत प्रकल्पग्रस्तांवरील घोर अन्याय दूर करून त्यांच्या नोकरी व मोबदल्याचा प्रश्न त्वरित निकाली काढा, असे निर्देश दिले.या संदर्भात ना. हंसराज अहीर यांनी आज गुरुवारी वीज केंद्र व इतर विभागातील अधिकाºयांची तातडीची आढावा बैठक बोलाविली. या बैठकीस चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, उपमहापौर अनिल फुलझेले, सीटीपीएसचे अधिकारी परचाके, प्रभावत, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जीवतोडे व अनेक गावातील सीटीपीएस प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.जमिनीचे संपादन करण्यात आले अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घेत न्याय देण्याची जबाबदारी असताना त्यांना आतापर्यंत नोकरीपासून वंचित ठेवण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र बदलवून त्यांच्या कायदेशिर वारसानांच्या नावे हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र परिवर्तन करून त्या प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्न मानवीय दृष्टीकोनातून सोडविण्याची आवश्यकता असल्याचेही ना. अहीर यांनी उपस्थित अधिकाºयांना संबोधित करताना सांगितले. किमान प्रकल्पग्रस्तांबाबत शासन धोरणात बदल अपेक्षित असल्याने त्या दृष्टीकोनातून अधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची सूचना देवून नोकरी व मोबदलाविषयक प्रलंबित प्रकरणाची सविस्तर माहिती स्थानिक पातळीवर घेऊन नोकरीविषयक प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याच्या सूचना केल्या.महाऔष्णिक केंद्रातील शिकाऊ उमेदवारांना शासन परिपत्रकानुसार मानधन वृद्धी मिळत नसल्याच्या तक्रारीबाबत ना. अहीर यांनी अधिकाºयांची कानउघाडणी करीत येत्या १५ ते २० दिवसामध्ये संंबधित शिकाऊ उमेदवारांना मानधन वृद्धीची देय असलेली राशी त्वरित देण्याचे निर्देश दिले.सामाजिक दायित्वनिधी (सीएसआर)च्या विकास कामांचा आढावा यावेळी अधिकाºयांनी ना. अहीर यांना सादर केला. सदर सामाजिक दायित्व निधी चंद्रपूर महानगरातील विकास कामांकरिता प्राधान्यक्रम देऊन वापरला जावा, अशाही सूचना त्यांनी केल्या.कामगारांना दिलासाचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत कुशल व अकुशल कामगारांना मानधनावर सामावून घेण्याच्या सूचना ना. अहीर यांनी दिल्या होत्या. मंत्र्यांच्या सूचनेनुसार २३१ कुशल व अकुशल कामगारांना २५ सप्टेंबरपासून मानधनावर सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या कामगारांना शैक्षणिक योग्यतेनुसार प्रतिमाह ६ ते १० हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचेही सीटीपीएस व्यवस्थापनाद्वारे सांगण्यात आले.