शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

आधी प्रतीक्षा २0१४ ची, आता नजर १६ मे वर

By admin | Updated: May 9, 2014 02:59 IST

२0१४ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर राजकारण्यांचे लक्ष गेल्या दीड-दोन वर्षांपासून लागले होते. कधी २0१४ हे वर्ष उजाडते आणि कधी लोकसभा निवडणूक येते ही उत्सुकता सार्‍यांच्या मनात होती.

नागरिकांत उत्सुकता : चंद्रपूर लोकसभेतील अंदाज अपना अपनावसंत खेडेकर■ बल्लारपूर२0१४ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीवर राजकारण्यांचे लक्ष गेल्या दीड-दोन वर्षांपासून लागले होते. कधी २0१४ हे वर्ष उजाडते आणि कधी लोकसभा निवडणूक येते ही उत्सुकता सार्‍यांच्या मनात होती. २0१२ व त्यानंतर २0१३ हे वर्ष उजाडले. या दोनही वर्षांचे त्या-त्या वर्षींच्या १ जानेवारीला राजकारण्यांनी स्वागत केले असले तरी त्यांचे सारे लक्ष २0१४ या वर्षाच्या उजाडण्याकडे लागले होते.२0१४ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सारे राजकीय पक्ष व राजकारणी दोन-दीड वर्षांपासून लागले होते. व्यूहरचना आखली जाऊ लागली होती. २0१४ हे वर्ष आले. अतिमहत्वाचे निवडणूक वर्ष म्हणून २0१४ या वर्षाचे सार्‍यांनी मनापासून स्वागत केले. लोकसभा निवडणूक कधी घोषित होणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन मतदानाचा पहिला टप्पा १0 एप्रिलला पार पडला. टप्प्या टप्प्याने ही निवडणूक १२ मेपर्यंत होणार आहे. आणि याचा निकाल १६ मे रोजी लागणार आहे. ज्या क्षेत्रातील मतदान आटोपले आहे, तेथे कोण निवडून येणार यावर चर्चा झडत आहेत. संपूर्ण भारतात, भाजपाला किती जागा मिळणार, काँग्रेस कुठपर्यंत धाव घेईल.अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' पक्षाच्या विजयाचा आकडा कुठे जाऊन थांबणार, याचे आपापल्या परीने आराखडे बांधले जात आहेत. काहीजण भाजपा दोनशेच्या आतच गाशा गुंडाळणार असे बोलत आहेत, तर कुठे काँग्रेसपक्ष भाजपाच्या आकड्यांच्या जवळपास जाऊन थांबणार, असा अंदाज लावला जात आहे. दिल्लीचा कडू अनुभव घेता आप दहा-बाराच्या वर जाणार नाही, असे सर्वत्र बोलले जात आहे. प्रादेशिक पक्षांच्या किती जागा मिळणार, खरेच मोदीच पंतप्रधान बनणार, राजनाथ सिंह, अरुण जेटली की सुषमा स्वराज याही चर्चा रंगत आहेत. प्रियंका गांधी बर्‍याच उशिरा मैदानावर आल्या. याआधी येऊन आजच्या एवढ्या आक्रमक झाल्या असत्या तर काँग्रेसची स्थिती सुधारली असती असे सारेजण म्हणत आहेत.चंद्रपूर लोकसभेबाबत बोलायचे झाल्यास काँग्रेस, भाजपा आणि आप हे तीनही पक्ष आपलाच उमेदवार निवडून येणार असे ठामपणे सांगत आहेत. त्यातल्या त्यात आप पक्षाचे अँड. वामनराव चटप यांचे सर्मथक तर चटप निवडून आलेच आहेत, अशा आविर्भावात बोलत आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. प्रचारात भाजपा सर्वच आघाडीत पुढे राहिला आहे. पण, चर्चा मात्र सर्वाधिक आपच्या झाडूचीच चालली. चटप यांच्या पाठीशी त्यांचा धनोजे कुणबी समाज मागील निवडणुकीप्रमाणे पूर्ण शक्तीनिशी राहिला. संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेला काँग्रेसचा पुगलिया गटही अँड. चटप यांच्यासोबत गेला. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे, हिंदी भाषिक मतदार कधी नव्हे ते या घडीला अँड. चटप यांच्या सर्मथनात नाव घेताना दिसला. या सार्‍या कारणापायी चटप यांचा झाडू शहर आणि गाव दोनही पातळीवर बराच चर्चेत आला. या चर्चेचे रूपांतर मतदानात नक्कीच झाले, असा ठाम विश्‍वास 'आप'वाल्यांना आहे. तसेच, आपच्या केंद्रीय नेत्यांनी चंद्रपूरची आपची जागा पक्की असे गृहीत धरले आहे.मोदीमय वातावरणात भाजपाने चंद्रपुरात आपला विजय पक्का मानने स्वाभाविक आहे. जोरदार मोदी लाट, भाजपाचे परंपरागत मतदार, हवा बघून त्या दिशेने झुकणारे मतदार आणि सर्वांत महत्वाचे नवीन तसेच युवा मतदारांपैकी बहुतांश मतदार भाजपाकडेच वळले आहेत, हा विश्‍वास. या सार्‍या जमेच्या बाजू भाजपाला दिसत आहेत. त्यामुळे, चंद्रपुरातून हंसराज अहीर हेच बाजी मारणार ही खात्री भाजपाला आहे. परंतु, दुसरीकडे केंद्रात ज्या पक्षाचे सरकार, चंद्रपूरला नेमके त्या पक्षाच्या विरोधातील पक्षाचा खासदार असे योगायोगाने घडत गेले. असा अनुभव चार निवडणुकीत आला आहे. या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी भीती स्पशरून जाण्याला बरीच जागा आहे. कारण, या घडीला केंद्रात भाजपाची सत्ता येण्याची अधिक शक्यता दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रचारात आप पक्षाच्या पुढे तर भाजपाच्या बराच मागे दिसला. काँग्रेस पक्षात यावेळच्या प्रचारात मागील तीन निवडणुकीमधून दिसलेला जोश उत्साह आढळला नाही. काँग्रेसवालेही खासगीत हे कबूल करतात. तरीही पंजाच निवडून येणार असे काँग्रेसजनांचे ठाम म्हणणे आहे.