शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

आंबोलीतील मतदारांची सुशिक्षित युवा उमेदवारांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

शंकरपूर : आंबोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी उच्च विद्याविभूषित सातही उमेदवारांना पसंती देऊन गावाची विकास धुरा ...

शंकरपूर : आंबोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी उच्च विद्याविभूषित सातही उमेदवारांना पसंती देऊन गावाची विकास धुरा सोपविली. आंबोलीत नऊ सदस्य आहेत.

बाहेरगावी शिक्षण घेऊन गावात परत आलेल्या युवकांनी गाव सुधारण्यासाठी युवा मंचची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी युवक - युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम केले. स्वच्छता मोहीम राबविली. शासकीय कामातील अडचणी सोडविण्याचे कार्य केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा बंद होत्या. पण युवकांनी गावातील मुलांना एकत्र करून शिक्षणाचे धडे दिले. गावातील भिंती बोलक्या केल्या. विकासासाठी ग्रामपंचायतवर सत्ता असणे गरजेचे आहे हे समजून आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्याचा संकल्प केला. हे सुशिक्षित विद्यार्थी युवा मंच परिवर्तन पॅनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि नऊपैकी सात उमेदवार निवडून आले. कला शाखेचा पदवीधर असलेला केशव गजबे, अभियंता शाखेचा वैभव ठाकरे, कला शाखेच्या पदवीधर शालिनी दोहतरे, वाणिज्य शाखेत पदवीप्राप्त शुभम मंडपे, कृषी शाखेत बीएससी असलेला स्वप्नील गजबे, सायन्स शाखेची पदवी असलेली प्रियंका नागोसे आणि कला शाखेत पदवीधर असलेली रज्जू सवाईकर हे सर्व युवक निवडून आले आहेत. हे सर्व २७ वर्षांच्या आतील आहेत. या युवकांजवळ निवडणुकीसाठी लागणारा निधी नसल्यामुळे त्यांनी गावात व सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन करून निवडणुकीचा खर्च उभा केला होता.