शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

विठोबाने घेतला गाडगेबाबांचा वसा

By admin | Updated: February 23, 2015 01:20 IST

शासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत.

अमोद गौरकार चिमूरशासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत. मात्र गाडगेबाबाचा वसा घेऊन प्रत्यक्ष कृती करीत ग्राम स्वच्छतेचे धडे जनतेला पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कवडसी (देश) येथील विठोबा हरी वैद्य करीत आहेत.शंकरपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले कवडसी (देश) हे एक हजार लोकवस्तीचे गाव. याच गावातील रहिवासी असलेले विठोबा वैद्य. आज त्याचे वय ५५ वर्ष आहे. या वयातही गावोगावी फिरुन प्रत्यक्ष कृतीतून ते ग्रामस्वच्छतेचे धडे लोकांना देत आहेत. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचा वसा चालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दररोज पूर्ण गाव स्वच्छ करणे, गावातील सर्व रस्त्यावर पहाटे पाणी शिंपणे, विठ्ठल मंंदिरात पूजा करणे व सायंकाळी भजन व कीर्तन करणे हा त्याच नित्यक्रम आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि त्यातून रोगराई पसरत होती. ते आपणाला राष्ट्रसंतांच्या भजनातून, गाडगेबाबांच्या कीर्तनातून समजले आणि म्हणूनच प्रथम आपला गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केला व त्यातूनच गावाची स्वच्छता केली. या कृतीची दखल घेऊन गावकऱ्यांनी आपल्याला पूजारी पद दिले, असे त्यांनी सांगितले. आज ते कवडसी व इतर परिसरातील गावात ग्रामस्वच्छता करीत आहेत. विठोबा हे सायलकने प्रवास करीत असून त्यांच्या सायकलच्या मागे नेहमीच खराटा बांधलेला असतो. जिथे घाणीचे साम्राज्य दिसेल, तिथे ते खराट्याने झाडून स्वच्छ करतात. त्याच गावात भजन व कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेवर मार्गदर्शन लोकांना करतात. आपल्या संसाराला तिलांजली देऊन ग्राम स्वच्छतेसाठी त्यांची गावोगावी भटकंती सुरूच असते. कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करता जे मिळेल ते खाऊन ते आपली उपजिवीका चालवित आहेत. असा आधुनिक विठोबा मात्र शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे. आतातरी शासनाने या विठोबाला कुटुंब चालविण्याइतपत मानधन द्यावे, अशी अपेक्षा आहे.