शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विरूर येथील पाणी पुरवठा योजना सहा वर्षांपासून थंडबस्त्यात

By admin | Updated: December 6, 2014 22:45 IST

राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथे भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजुर झालेली ३८ लाख रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना मागील सहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथे भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजुर झालेली ३८ लाख रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना मागील सहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची गंभीर समस्या येथे निर्माण झाली आहे. सुरुवातीला निवड झालेल्या सामाजिक लेखा परीक्षण समितीच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार सहा वर्षापूर्वी झालेल्या ग्रामसभेमध्ये पाणी पुरवठा समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती व देखरेख समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार शासनाकडून पाण्याच्या टाकीच्या बांधकामाकरिता पहिला हप्ता म्हणून १५ लाख रुपये निधी प्राप्त झाला. पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव हे समितीच्या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता व सभासदांना कोणतीही पूर्व सुचना न देता आपल्याच मनमर्जीने निधीचा पहिला हप्ता १५ लाख रुपये खर्च केला. झालेल्या खर्चाचा सामाजिक लेखा परीक्षण समिती व देखरेख समितीच्या सदस्यांना हिशोब न दिल्याने अध्यक्ष व सचिवांना हिशोबाची विचारणा केली. हिशोब दाखविले असता हिशोबात तफावत आढळल्याने पुढील हप्त्यास सदर समितीने मंजुरी दिली नाही. पाणी पुरवठा समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती व देखरेख समितीच्या सदस्यांनी समझौता करून मागील झालेल्या खर्चाची शासकीय पातळीवर चौकशी करून कारवाई करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले आणि सामाजिक लेखा परीक्षण समिती व देखरेख समितीने पाण्याच्या टाकीचे काम करण्यास दुसऱ्या हप्त्यास मंजुरी दिली. पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी पाणी पुरवठा सुरू न झाल्याने पाण्याच्या टाकीचे पाणी कुठे मुरत आहे, असा प्रश्न नागरिकामध्ये विचारला जात आहे.यावर्षी पाण्याची पातळी खोलवर गेल्याने उन्हाळ्यात जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच पूर्वीच्या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे बांधकामाला सुरुवात होत असल्याने पाणी पुरवठा दहा ते पंधरा दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी सामना करावा लागणार आहे.कंत्राटदार, अभियंता व वरिष्ठ अधिकारऱ्यांनी सदर पाणी पुरवठ्याबाबत योग्य चौकशी करून नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)