शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

बल्लारपूरचा ‘व्हीआयपी कोटा’ नागपूरला

By admin | Updated: November 23, 2015 00:51 IST

बल्लारपूरचे रेल्वेस्थानक राज्याची सीमा बदलणारे आहे. दक्षिण व उत्तर आणि पूर्व-पश्चिम रेल्वेचे जंक्शन येथे आहे.

रेल्वे प्रशासनाची करामत : प्रवाशांना सहन करावी लागते गैरसोयअनेकश्वर मेश्राम बल्लारपूर बल्लारपूरचे रेल्वेस्थानक राज्याची सीमा बदलणारे आहे. दक्षिण व उत्तर आणि पूर्व-पश्चिम रेल्वेचे जंक्शन येथे आहे. वर्षाला कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या बल्लारशाह रेल्वेस्थानकाला १२ प्रवाशांसाठी ‘व्हीआयपी कोटा’ मंजूर होता. मात्र रेल्वे प्रशासनाने करामत करून बल्लारपूरचा ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ नागपूरला पळविल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात असून नाराजीचा सूर उमटू लागले आहे.बल्लारपूर औद्योगिक शहर असून जागतिक दर्जाचा कागद उद्योग येथे आहे. सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या कोळसा खाणी, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला, पर्यटकांना खुणवणारे वने आहेत. रेल्वेच्या जाळ्यामुळे शहर दक्षिण भारताला जोडले आहे. येथील रेल्वे स्थानकावरुन सरळ रेल्वे सेवा दिल्ली-चेन्नईला जोडली आहे. राज्याची राजधानी मुंबईसाठी ‘लिंक रेल्वे एक्स्प्रेस’ सोडण्यात येते. परिणामी रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.येथील रेल्वे स्थानकावरुन प्रवास करताना मान्यवर व मोठ्या हुद्याच्या व्यक्तींना सुकर प्रवास घडावा म्हणून रेल्वे प्रशासनाने १२ मान्यवरांसाठी ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ आरक्षित केला होता. मात्र ध्यानीमनी नसताना रेल्वे मंत्रालयाने येथील सदर कोटा नागपूर येथील रेल्वेस्थानकाला जोडल्याची माहिती विश्वसनीय सुत्रानी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह रेल्वे स्थानकाची महती दूरवर पसरली आहे. केंद्र सरकारमध्ये जिल्ह्याचे खासदार हंसराज अहीर राज्यमंत्री आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण तीन खात्याचे मंत्री असताना येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ वगळण्यात का आला, याची विचारणा होत आहे.बल्लारशाह रेल्वे स्थानक महान व थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पवित्र झाले आहे. येथून शेकडोंवर लांब पल्याच्या प्रवाशी गाड्या दररोज धावत असतात. जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असताना येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ नागपूरला वळती करण्याचे कारण रेल्वे प्रशासनाने का घेतले, याचा उलगडा होणे क्रमप्राप्त आहे. अलीकडेच येथील रेल्वे स्थानकाला मॉडेल दर्जा देण्याचे रेल्वे प्रशासनाने सुतोवाच केले आहे. असे असताना ‘व्हीआयपी’ कोट्याला कात्री का लावण्यात आली, याचा सोक्षमोक्ष रेल्वे प्रशासनाने लावण्याची गरज आहे. येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ पूर्ववत सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधोरेखित असलेले महत्त्व कायम ठेवण्याची मागणी आहे.बल्लारशाह रेल्वेस्थानक मध्यवर्ती आहे. यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे. रेल्वेचा ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ सुरू आहे. मात्र डीआरएम नागपूर कार्यालयाकडे येथील अधिकारी सदर कोट्याचा पाठपुरावा करीत नाही. लांब पल्ल्याच्या दिल्ली, चेन्नई, मुंबई, विजयवाडा रेल्वेसाठी डीआरएम कार्यालयाकडून ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ प्राप्त करण्यासाठी मान्यता घ्यावी लागते. या संदर्भात बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधीक्षक यांची विचारणा करून रेल्वे प्रशासनाच्या जीआरची माहिती मागणार आहे.- श्रीनिवास सुंचूवारअध्यक्ष जिल्हा रेल्वे प्रवाशी संघ, बल्लारपूर