शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

सामूहिक प्रयत्नांतूनच गावे होतील समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:58 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींनी द्यावी मतभेदांना तिलांजली

भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. यातून जिल्ह्यातील गावे समृद्ध होतील, असे मत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) ओमप्रकाश यादव यांनी मकरसंक्रांतिनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. ग्रामोन्नती हा स्वराज्य संस्थांचा केंद्र्रबिंदू आहे. ग्रामविकासाच्या विविध समस्यांची चर्चा व्हावी व समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविणे आवश्यक आहे. ग्राम सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, याकरिता ग्रामोद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी व ग्रामीण माणसांचा विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. लोकाभिमुख ग्राम प्रशासनासाठी ग्रा. पं. भवन, जुन्या भवनाचे विस्तारीकरण, अंतर्गत व गावाला जोडणारे रस्ते निर्माण केली जात आहेत. दुर्बलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, दलित वस्तींचा विकास आदी कामांना गती मिळावी, याकरिता ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास देश जोडण्याची गती पुन्हा वाढेल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले.अनुदानीत कृषी अवजारे, शेतीशाळा, मार्गदर्शन, सिंचन सुविधा, आदर्श अंगणवाडी, बालस्नेही शिक्षणपद्धती, पिण्याचे पाणी, डिजिटल शाळा, आनंदी शिक्षण पद्धती रूजविण्यासाठी विरोधी नव्हे तर विकासाभिमुख दृष्टीची गरज असल्याचे यादव यांनी नमूद केले