शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

अर्धवट शौचालये असलेली गावे अनुदानास मुकणार

By admin | Updated: May 24, 2015 01:57 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे.

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता ज्या गावात अर्धवट शौचालय्े बांधकाम झाली असतील त्या गावात उर्वरित कामेही पूर्ण करावी लागणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागाला हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीमधील तब्बल एक लाख ४६ हजार ८३० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान देण्याची तरतुद केली. सन २०१४-१५ या वर्षात २२ हजार ७४१ शौचालयाचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. तर ग्रामीण भाग हागणदारी मुक्तीसाठी वर्षनिहाय पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र आजही अनेक गावातील शौचालये अर्धवट दिसून येतात. त्यामुळे गाव हागणदारी मुक्त होणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय घेतला आणि हे अनुदानही गावात स्थापन झालेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फतच अदा करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे नवी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या संकल्पानुसार बल्लारपूर पंचायत समिती संपूर्ण हागणदारी मुक्त केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात भद्रावती व राजुरा पंचायत समिती अंतर्गत ३१४ ग्रामपंचायतीमधील ३२ हजार ३१ शौचालय नसलेल्या कुटुंबाना बांधकामासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात ब्रह्मपुरी, कोरपना, नागभीड, सिंदेवाही व वरोरा पंंचायत समितीच्या १३३ ग्रामपंचायती अंतर्गत ३६ हजार ७६३ कुटुंबाना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.चवथ्या टप्प्यात गोंडपिंपरी, जिवती, मूल व पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत ९६ ग्रामपंचायतीमध्ये शौचालय नसलेल्या ३२ हजार १६ जणांना वैयक्तिक शौचालय बांधकामाला प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अखेरच्या पाचव्या टप्प्यात चिमूर, चंद्रपूर व सावली पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या ४९ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील २८ हजार १८२ जणांचे वैयक्तिक शौचालय उभारुन जिल्हा हागणदारी मुक्त केले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)