शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अर्धवट शौचालये असलेली गावे अनुदानास मुकणार

By admin | Updated: May 24, 2015 01:57 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे.

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता ज्या गावात अर्धवट शौचालय्े बांधकाम झाली असतील त्या गावात उर्वरित कामेही पूर्ण करावी लागणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागाला हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीमधील तब्बल एक लाख ४६ हजार ८३० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान देण्याची तरतुद केली. सन २०१४-१५ या वर्षात २२ हजार ७४१ शौचालयाचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. तर ग्रामीण भाग हागणदारी मुक्तीसाठी वर्षनिहाय पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र आजही अनेक गावातील शौचालये अर्धवट दिसून येतात. त्यामुळे गाव हागणदारी मुक्त होणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय घेतला आणि हे अनुदानही गावात स्थापन झालेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फतच अदा करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे नवी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या संकल्पानुसार बल्लारपूर पंचायत समिती संपूर्ण हागणदारी मुक्त केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात भद्रावती व राजुरा पंचायत समिती अंतर्गत ३१४ ग्रामपंचायतीमधील ३२ हजार ३१ शौचालय नसलेल्या कुटुंबाना बांधकामासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात ब्रह्मपुरी, कोरपना, नागभीड, सिंदेवाही व वरोरा पंंचायत समितीच्या १३३ ग्रामपंचायती अंतर्गत ३६ हजार ७६३ कुटुंबाना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.चवथ्या टप्प्यात गोंडपिंपरी, जिवती, मूल व पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत ९६ ग्रामपंचायतीमध्ये शौचालय नसलेल्या ३२ हजार १६ जणांना वैयक्तिक शौचालय बांधकामाला प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अखेरच्या पाचव्या टप्प्यात चिमूर, चंद्रपूर व सावली पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या ४९ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील २८ हजार १८२ जणांचे वैयक्तिक शौचालय उभारुन जिल्हा हागणदारी मुक्त केले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)