शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

आदर्शग्राम निमिर्तीसाठी गावकऱ्यांनी सज्ज व्हावे

By admin | Updated: January 2, 2017 01:17 IST

जिल्हा परिषद चंद्रपूरतंर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याकरिता सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून

पिपर्डा हागणदारीमुक्त ग्राम घोषित : एम.डी. सिंह यांचे प्रतिपादन चंदपूर : जिल्हा परिषद चंद्रपूरतंर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याकरिता सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असून जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ करुन आदर्शग्राम निर्मिती करिता ग्रामस्थांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी एम.डी.सिह यांनी केले. कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित नववर्षाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. संजय धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणुन तहसिलदार पुष्पलता कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र मोहिते, गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर, सरपंच चंद्रभान तोडासे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे सोपान नागरगोजे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते जिल्ह्यातील पहिल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन, व गावात लोकसहभागातून निर्माण केलेले स्वागत चौक व किसान चौकांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.गावात नववर्षाच्या शुभपर्वावर ग्रामसभा घेवून, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिह, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे, तहसिलदार पुष्पलता कुमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र मोहिते, गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर यांच्या उपस्थितीत सरपंच चंद्रभान तोडासे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पिपर्डा ग्राम हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. यावेळी आ. धोटे म्हणाले, सदर उपक्रम राबविणारी पिपर्डा ही महाष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. तसेच आमदार आदर्शग्राम योजनेत पिपर्डा गावाचा समावेश केल्याची घोषणा आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केली. या कार्यक्रमात पिपर्डा ग्रामस्थांच्या वतीने आ. संजय धोटे यांची लाडुतुला करण्यात आली. याशिवाय पिपर्डा ग्राम हागणदारीमुक्त करण्याकरिता विविध अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असुन, असे कर्मचारी विस्तार अधिकारी आरोग्य शेख, ग्रामविकास अधिकारी एन. एच. धवणे, गटसमन्वयक रवी लाटेलवार, समूह समन्वयक लारेन्स खोबरागडे यांना विषेश कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पिपर्डा गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी आपल्या प्रास्ताविकातून पिपर्डा गावात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची व भविष्यात गावाच्या विकासाची पुढिल वाटचाल विषयी नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी धंनजय साळवे यांनी केले. कार्यक्रमास स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार कृष्णकान्त खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, साजिद निजामी, मनोज डांगरे तालुक्यातील सर्व ग्रामसेवक , पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पिपर्डा गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)