शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रायपूर येथील ग्रामस्थ मदतीने सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:30 IST

रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून धान्य, कपड्यांचे वाटप : जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा: रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.रायूपर येथील जि.प. शाळेचे वर्ग आणि दोन-तीनच विद्यार्थी, केवळ एकच सिमेंट विटांच तुटकं घर आणि इतर १४ कुडाच्या घरांची वस्ती हे वास्तव आहे. कोलामक्रांती संघटनेचे संस्थापक विकास कुंभारे यांच्या प्रयत्नातून गावकºयांनी स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या गावातील परिस्थितीची जाणीव होताच सगळ्यांनी प्राचार्या आणि शिक्षकांसह खडकी गावाकडे धाव घेतली. तब्बल सहा किलोमीटर जंगलातून गावकºयांसह गावात विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता केली. घरुन आणलेले कपडे आणि धान्य गावकºयांना वाटप केले. सोबतच कोलगेट, ब्रश, साबण, तेल तथा गोड पदार्थही गावकºयांना भेट म्हणून दिल्या. ग्रामस्थांचे हाल पाहून विद्यार्थीही गहिवरले. येथील नागरिकांना पायी चालत जाऊन नगराळा अथवा बेलगाव येथून बस पकडावी लागते. शासनाच्या कोणत्याही योजना गावात पोहोचल्या नाहीत. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या या गावाचा अद्याप विकास न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.बैलगाडीवर बसवून रुग्ण जातात बाहेरगावीरुग्णांना उपचारासाठी न्यायचे असल्यास बैलगाडीशिवाय कुठलाच पर्याय नाही. ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. जिवती किंवा गडचांदूर येथे जाण्यासाठी सुविधाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.