लोकमत न्यूज नेटवर्क, शंकरपूर (चंद्रपूर): वाघाच्या हल्ल्यात शंकरपुरातील शेतकरी ईश्वर भरडे यांचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क मृतदेह सोबत घेऊन बुधवारी रात्रभर वनविभाग विरोधात आंदोलन केले. वाघाला जेरबंद करेपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही, असा इशारा देऊन ठिय्या मांडला होता. अखेर वनविभागाने लेखी आश्वासन दिल्याने गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. ग्रामस्थांनी प्रारंभी भिसी-आंबोली रस्त्यावरील असोला बसथांब्याजवळ आंदोलन सुरू केले. त्यानंतर शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. वाघाला ठार करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. वनविभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. यानंतर ईश्वर भरडे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
शंकरपूरमध्ये पाळला कडकडीत बंद
रास्ता रोको आंदोलन दरम्यान शंकरपूर कडकडीत बंद पाळण्यात आला. येत्या शनिवारपर्यंत वाघाला पकडले नाही. तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला. वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल. मृताच्या वारसाला नोकरी दिली जाईल. परिसराला तारेचे कुंपण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वनविभागाने दिले. आंदोलनस्थळी पोलिसांची मोठा फौजफाटा तैनात होता. स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
Web Summary : Outraged villagers protested with a farmer's body after a fatal tiger attack. They demanded the capture or killing of the tiger. The protest ended after the forest department gave written assurances of action, including a job for the family and fencing.
Web Summary : बाघ के हमले में किसान की मौत के बाद ग्रामीणों ने शव के साथ विरोध प्रदर्शन किया। उन्होंने बाघ को पकड़ने या मारने की मांग की। वन विभाग द्वारा कार्रवाई के लिखित आश्वासन के बाद विरोध प्रदर्शन समाप्त हो गया, जिसमें परिवार के लिए नौकरी और बाड़ लगाना शामिल था।