शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

By admin | Updated: December 9, 2014 22:48 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या.

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी गाव हागणदारीमुक्त करण्याची हमी अध्यक्ष तथा सिईओंना दिली आहे.उघड्यावर शौचास जाणे ही माणसाला शोभणारी बाब नसून, गावात वाढणारी अस्वच्छता ही आपले आरोग्य बिघडविण्याचे काम करते. त्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा, असा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी गृहभेटी दरम्यान लाभार्थ्यांना दिला. गावस्तरावर अधिकाधिक स्वच्छतेची व्याप्ती वाढावी व गाव पूर्णत: स्वच्छ व १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे याकरिता जिल्ह्यातील गावात जावून प्रत्यक्ष गृहभेट देऊन गावकऱ्यांना शौचालयाच महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चुनाभट्टी, बामणी, काटवल या गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी प्रत्यक्ष घरी जावून चर्चा केली जात आहे. चर्चेदरम्यान गावकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून प्रत्येक लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम व नियमित वापराकरिता विनंती करण्यात येत आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावकरी स्वत:हून शौचालय बांधकामाकरिता पुढाकार घेत आहे. अनेक गावातील गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याची हमी दिली आहे.बल्लारपूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत समिती सदस्य सुमन लोहे, गटविकास अधिकारी गजभे, विसापूरचे सरपंच बंडू गिरडकर, काटवलचे सरपंच माधुरी ढोमणे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, मनुष्य बळ विकास सल्लागार बंडू हिरवे, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनील नुत्तलवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी कोरपना तालुक्यातील काही गावांत भेटी देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)