शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

By admin | Updated: December 9, 2014 22:48 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या.

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी गाव हागणदारीमुक्त करण्याची हमी अध्यक्ष तथा सिईओंना दिली आहे.उघड्यावर शौचास जाणे ही माणसाला शोभणारी बाब नसून, गावात वाढणारी अस्वच्छता ही आपले आरोग्य बिघडविण्याचे काम करते. त्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा, असा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी गृहभेटी दरम्यान लाभार्थ्यांना दिला. गावस्तरावर अधिकाधिक स्वच्छतेची व्याप्ती वाढावी व गाव पूर्णत: स्वच्छ व १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे याकरिता जिल्ह्यातील गावात जावून प्रत्यक्ष गृहभेट देऊन गावकऱ्यांना शौचालयाच महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चुनाभट्टी, बामणी, काटवल या गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी प्रत्यक्ष घरी जावून चर्चा केली जात आहे. चर्चेदरम्यान गावकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून प्रत्येक लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम व नियमित वापराकरिता विनंती करण्यात येत आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावकरी स्वत:हून शौचालय बांधकामाकरिता पुढाकार घेत आहे. अनेक गावातील गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याची हमी दिली आहे.बल्लारपूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत समिती सदस्य सुमन लोहे, गटविकास अधिकारी गजभे, विसापूरचे सरपंच बंडू गिरडकर, काटवलचे सरपंच माधुरी ढोमणे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, मनुष्य बळ विकास सल्लागार बंडू हिरवे, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनील नुत्तलवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी कोरपना तालुक्यातील काही गावांत भेटी देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)