शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

खेड्यातला वनपाल डी.लिट. पदवीने सन्मानीत होतो तेव्हा..!

By admin | Updated: June 11, 2014 23:52 IST

मनात इच्छाशक्ती, हिंमत आणि काहीतरी करायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर असले की, चांगली लक्षवेधी आणि इतरांना प्रेरक ठरावी अशी प्रगती करू शकतो. वन विभागात कार्यरत कर्मचारी विविध पदव्या मिळवू शकतो.

बाबुराव परसावार- सिंदेवाहीसिंदेवाही : मनात इच्छाशक्ती, हिंमत आणि काहीतरी करायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर असले की, चांगली लक्षवेधी आणि इतरांना प्रेरक ठरावी अशी प्रगती करू शकतो. वन विभागात कार्यरत कर्मचारी विविध पदव्या मिळवू शकतो. याची कल्पनाच करू शकत नाही. मात्र येथील वन विभागात कार्यरत वनपाल नामदेव कापसे यांनी विविध पदव्या प्राप्त केल्या. एवढेच नाही तर ते जनप्रबोधनाचे प्रभावीपणे कार्य करीत आहेत. ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची आवड असल्यामुळे शालेय जीवनात त्यांनी लिहिलेल्या कविता व लेख वर्तमानपत्रात प्रकाशीत झाले. ‘अध्यात्म’ या विचारावरील कात्रणाचे पाच खंड त्यांनी संग्रहीत केले आहे. कापसे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त गावोगावी जावून प्रबोधनात्मक मार्गदर्शन करीत आहेत.राष्ट्रसंताच्या साहित्याचे संकलन, लेखन, चिंतन यामुळे ते राष्ट्रसंताच्या विचाराचे वाहक बनले. शासकीय काम नियमीत करून सामाजिक व प्रबोधनाचे कार्यही कापसे हे मोठ्या कौशल्याने करीत आहेत. त्यांना आतापर्यंत साहस पुरस्कार, वन्य प्राणी संरक्षणाबाबत प्रशस्तीपत्र, श्री गुरुदेव ग्रामगीता विश्व विद्यापीठ अड्याळ टेकडी यांच्याकडून सन्मानपत्र, वन विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनमंत्र्याकडून २५ हजार रुपये पुरस्कार व प्रशस्तीपत्र, छत्रपती शिवाजी आदर्श समाज सेवक सन्मान रूरल नैचरोपैथी आर्गनायझेशन औरंगाबादतर्फे (डी.एम.एच.) डॉक्टर पदवीने सन्मानीत, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडून महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून कापसे हे समाज प्रबोधनाचे कार्य गेल्या २० वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आनलाईन विद्यापीठाने डि.लिट. पदवीने सातारा येथे २३ मार्च २०१४ सन्मानीत केले. इंटरनॅशनल ह्युमन राईटस जस्टीस फेडरेशनद्वारा ३४ वा आंतरराष्ट्रीय दिक्षांत समारोहात विद्यापीठाचे कुलगुरू दिनबंधू, डॉ. मधुसुदन घाणेकर, संशोधक डॉ. सुधीर तारे, डॉ. विठ्ठल मदने यांच्याहस्ते कापसे यांना डी.लिट. पदवी बहाल करण्यात आली. आत्मविश्वास दृढ निश्चय, समाज कार्य करण्याची तळमळ यातूनच मी घडलो आहे, असे त्यांचे मत आहे.