शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी शेणखत व दुधाची टंचाई

By admin | Updated: May 11, 2017 00:41 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत.

सिंदेवाही तालुका : चाराटंचाईमुळे पशुधनात मोठी घटलोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली असून चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना विक्रीस काढत आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत व दुध टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.देशातील ७५ टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशगातीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाच ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. दुसरीकडे शेतमजुराच्या मजुरीत पाचपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असायचा. त्या गोठ्यात बैल व गाय दिसत हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाल्याने बैलाचे मोठे दिसेनासे झाले आहे. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखूनठेवायचे. आत कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळत दुध, दही, लोणी, तुप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते.सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादन वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता मात्र गावात जनावर कळप राखायला गुराखी मिळत नाही.चाऱ्याचे जंगल सपाटसध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उद्याण आले आहे. परिणामी जंगले कमी होत असून जनावराला हिवरा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपल्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे. त्यातही काही जंगलावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक तथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना येथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.पिशवीच्या दूधाला प्राधान्यग्रामीण भागात दूध मिळत नसल्यामुळे नाईलाजाने फ्लॉस्टिक पिशवीमधील दूध विकत घ्यावे लागत आहे. नवजात बालकांनाही गायी, म्हशीचे दूध मिळणे अशक्य झाले आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडे पशु वृद्धीसाठी विविध योजना आहेत. त्यात दुधाळू जनावरे वाटपाची योजना आहे. तथापि शेतकऱ्यांकडे चारा पाणी उपलब्ध नसल्याने या योजनेचा लाभ घेण्याची हिमत शेतकरी दाखवित नाहीत.