शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

गावोगावी शेणखत व दुधाची टंचाई

By admin | Updated: May 11, 2017 00:41 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत.

सिंदेवाही तालुका : चाराटंचाईमुळे पशुधनात मोठी घटलोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली असून चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना विक्रीस काढत आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत व दुध टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.देशातील ७५ टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशगातीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाच ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. दुसरीकडे शेतमजुराच्या मजुरीत पाचपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असायचा. त्या गोठ्यात बैल व गाय दिसत हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाल्याने बैलाचे मोठे दिसेनासे झाले आहे. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखूनठेवायचे. आत कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळत दुध, दही, लोणी, तुप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते.सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादन वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता मात्र गावात जनावर कळप राखायला गुराखी मिळत नाही.चाऱ्याचे जंगल सपाटसध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उद्याण आले आहे. परिणामी जंगले कमी होत असून जनावराला हिवरा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपल्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे. त्यातही काही जंगलावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक तथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना येथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.पिशवीच्या दूधाला प्राधान्यग्रामीण भागात दूध मिळत नसल्यामुळे नाईलाजाने फ्लॉस्टिक पिशवीमधील दूध विकत घ्यावे लागत आहे. नवजात बालकांनाही गायी, म्हशीचे दूध मिळणे अशक्य झाले आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडे पशु वृद्धीसाठी विविध योजना आहेत. त्यात दुधाळू जनावरे वाटपाची योजना आहे. तथापि शेतकऱ्यांकडे चारा पाणी उपलब्ध नसल्याने या योजनेचा लाभ घेण्याची हिमत शेतकरी दाखवित नाहीत.