शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

विहीरगाव तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 29, 2014 23:45 IST

सिंचनाच्या सोयीेसाठी म्हणून ब्रिटिशांनी निर्माण केलेला विहीरगाव येथील तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या शासकीय जागेवर घरे उभी राहू लागल्याने भविष्यात हा तलाव

मूल : सिंचनाच्या सोयीेसाठी म्हणून ब्रिटिशांनी निर्माण केलेला विहीरगाव येथील तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या शासकीय जागेवर घरे उभी राहू लागल्याने भविष्यात हा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय होण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी येथील विहिरगाव परिसरातील सर्व्हे नं. ५३ मध्ये ५२.३९ एकर जागेत तलाव निर्माण केला. १९२० नंतरच्या एकत्रिकरणाच्या काळात सदर तलावाची जागा सर्व्हे नं. ७१ करण्यात येऊन तलावाची सर्व्हे नं. २२५ दाखविण्यात येऊन सातबारामध्ये १९.२१ हे.आर. (५०.२१) असे नमूद करण्यात आलेल्या बंदोबस्त अभिलेख्यानुसार महसूल प्रशासनाने ५२.३९ एकर आकारमान असलेल्या या तलावाचे दोन भाग पडून सर्व्हे नं. ५३/१ व ५३/२ असे करताना तलावाच्या कमी करण्यात आलेल्या आराजीच्या जागेवर झुडपी जंगल अशी नोंद केली. कालांतराने शासकीय दस्ताऐवजात झुडपी जंगल असे नमूद केलेल्या जागेवर काही लोकांनी जबरानजोत शेती करणे सुरू केल्यानंतर सातबारावर तशा नोंदी करण्यात आल्या. शेतीच्या माध्यमातून सदर जागेवर जबरान शेती केल्यानंतर सातबारावर नोंदी करून घेतल्यानंतर अनेक जण सदरची जागा विकून मोकळे झाले.जबरान करणाऱ्या मंडळीकडून सदर जागा गैरमार्गाने खरेदी केल्यानंतर अनेकांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून सादर जागेवर ले- आऊट पाडून सदर जागा स्वमालकीची समजून सर्रासपणे विकण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे वर्तमान सातबारामध्ये तलावाची एकूण आराजी ५० एकर २१ आर दाखविण्यात आली असली तरी तलावात वाढलेल्या प्रचंड अतिक्रमणामुळे तलावाची आराजी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.तलावाच्या जागेवर जबरान करून विक्री केल्यानंतर आज त्यापैकी अनेक जागेवर घरे निर्माण झाली आहे. परिणामी तलावातील पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. सदर प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीला भविष्यात सिंचनाचा फटका बसणार आहे.शासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेतीसाठी सिंचन व्यवस्था होऊ शकत नसल्याने शेकडो एकर शेती पडीत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय व्हावी,या उद्देशाने ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या तलावाची जागा प्रशासनाने दुर्लक्ष आणि संधी साधुपणामुळे काही मंडळी गिळंकृत करीत असल्याने सिंचन व्यवस्था असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो एकर शेती पडत राहण्याची शक्यता आहे.सिंचन विभागाच्या अधिकारात असलेल्या तलावाच्या सदर जागेवर काही मंडळी ले- आऊट पाडून सर्रासपणे विकत असताना नगरपालिका प्रशासन त्या जागेवर घर बांधकामास परवानगी देत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला भविष्यात मोठा फटका बसणार आहे. तलावाच्या जागेवर अनधिकृरीत्या घरे बांधून राहत असताना पावसाळ्याच्या दिवसात सदर परिसरात आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. तेव्हा हेच प्रशासन तलावाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या मंडळींना धोका होऊ नये म्हणून सुरक्षा पुरवित असते. यावरुन शासन त्यांनाच सहकार्य करीत असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)