शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईची ओटी भरण्यास बळीराजा आतूर

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण

चिमूर : चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण निर्मिती होत असून शेतकरी वर्गासह सर्व समान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण आभाळाकडे नजरा लावून असून ये रे, ये रे, पावसा... अशी आर्त हाक सुरू आहे. पावसाअभावी बळीराजा सर्व सोपस्कार उरकवून, काळ्या आईची ओटी भरण्यासाठी आतूर झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चिमूर तालुक्यात काही भागात तुरळक पाऊस झाला. या तुरळक एका दिवसाच्या पावसाने व रोज होणाऱ्या वातावरणाने काही भागातील शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणी केली. मात्र पुरेसा पाणी न आल्याने बीज उगवलेच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तर अनेक गावात पाऊस न आल्याने पाऊस कधी येणार, अशीच चर्चा व वरुणराजाला साकडे घालने सुरू झाले आहे. पूर्व मौसमी पावसाचा कालावधी उलटूनही वरुणराजाने अद्याप हजेरी लावली नाही. मान्सून पुढे गेल्याच्या बातम्या झळकत असल्यामुळे जगायचे कसे, जनावरे जगवायची कशी, कर्ज फेडायचे कसे, आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना आनंदाचा पारावार नव्हता. मात्र वरुणराजा शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. आकाशात ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नसल्याने अजून किती दिवस परीक्षा पाहणार, असे अनेक जण बोलून दाखवताना दिसतात.आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बळीराजा आता तरी बरस अशी आर्त हाक सुरू असून काही गावात पूजा, होमहवन, घंटानाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी आभाळ झाला. मात्र पाऊस पडला नाही. (प्रतिनिधी)चिमूर तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी अजूनही तिफण हातात घेतली नाही. पावसाच्या गैरहजेरीने बळीराजा चांगलाच भांबावून गेला आहे. गतवर्षी चिमूर परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या आईची ओटी वेळेवर भरली व काही प्रमाणात कापूस व धान्याचे उत्पादन घेतले होते. मात्र यावर्षी वरुणराजा बरसेल व चांगल्या दमाचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी दिवस मोजत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मागच्या वर्षीच्या उत्पादनातून जनावरासाठी साठवून ठेवलेला बैलाचा चार आता संपण्यागत आला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडून हिरवा चारा येईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र आता चाऱ्याचा प्रश्न आहे.पेरण्या खोळंबल्या४चिमूर तालुक्यात खडसंगी, आमडी, बोथली, भिसी, शंकरपूर, जांभुळघाट, नेरी, मोरेगाव परिसरात पाऊस न झाल्याने धानाच्या पऱ्यासह कापसाच्या व सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करून ठेवली आहे. पाऊस न पडल्यास हजारो रुपये खर्चून खरेदी केलेले बियाणे निकामी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.