शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
4
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
5
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
7
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
8
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
9
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
11
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
12
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
13
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
14
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
15
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
16
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
17
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
18
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
19
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
20
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी

काळ्या आईची ओटी भरण्यास बळीराजा आतूर

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण

चिमूर : चिमूर तालुक्यासह जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दररोज पावसाची फक्त वातावरण निर्मिती होत असून शेतकरी वर्गासह सर्व समान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण आभाळाकडे नजरा लावून असून ये रे, ये रे, पावसा... अशी आर्त हाक सुरू आहे. पावसाअभावी बळीराजा सर्व सोपस्कार उरकवून, काळ्या आईची ओटी भरण्यासाठी आतूर झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. चिमूर तालुक्यात काही भागात तुरळक पाऊस झाला. या तुरळक एका दिवसाच्या पावसाने व रोज होणाऱ्या वातावरणाने काही भागातील शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणी केली. मात्र पुरेसा पाणी न आल्याने बीज उगवलेच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तर अनेक गावात पाऊस न आल्याने पाऊस कधी येणार, अशीच चर्चा व वरुणराजाला साकडे घालने सुरू झाले आहे. पूर्व मौसमी पावसाचा कालावधी उलटूनही वरुणराजाने अद्याप हजेरी लावली नाही. मान्सून पुढे गेल्याच्या बातम्या झळकत असल्यामुळे जगायचे कसे, जनावरे जगवायची कशी, कर्ज फेडायचे कसे, आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना आनंदाचा पारावार नव्हता. मात्र वरुणराजा शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. आकाशात ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नसल्याने अजून किती दिवस परीक्षा पाहणार, असे अनेक जण बोलून दाखवताना दिसतात.आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बळीराजा आता तरी बरस अशी आर्त हाक सुरू असून काही गावात पूजा, होमहवन, घंटानाद सुरू आहे. रविवारी सायंकाळी आभाळ झाला. मात्र पाऊस पडला नाही. (प्रतिनिधी)चिमूर तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी अजूनही तिफण हातात घेतली नाही. पावसाच्या गैरहजेरीने बळीराजा चांगलाच भांबावून गेला आहे. गतवर्षी चिमूर परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काळ्या आईची ओटी वेळेवर भरली व काही प्रमाणात कापूस व धान्याचे उत्पादन घेतले होते. मात्र यावर्षी वरुणराजा बरसेल व चांगल्या दमाचा पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी दिवस मोजत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मागच्या वर्षीच्या उत्पादनातून जनावरासाठी साठवून ठेवलेला बैलाचा चार आता संपण्यागत आला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडून हिरवा चारा येईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र आता चाऱ्याचा प्रश्न आहे.पेरण्या खोळंबल्या४चिमूर तालुक्यात खडसंगी, आमडी, बोथली, भिसी, शंकरपूर, जांभुळघाट, नेरी, मोरेगाव परिसरात पाऊस न झाल्याने धानाच्या पऱ्यासह कापसाच्या व सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करून ठेवली आहे. पाऊस न पडल्यास हजारो रुपये खर्चून खरेदी केलेले बियाणे निकामी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.