शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

By admin | Updated: June 9, 2014 23:32 IST

पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा

शेतकर्‍यांचेही नुकसान : पर्यावरण संरक्षणाचे धिंडवडेसास्ती : पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अर्मयाद उपसा, वाहनांचे वाढते प्रमाण तसेच वाढते औद्योगिकरण हे सर्व पर्यावरण संतुलित राखण्यात बाधक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात मानवाला सुखी व समृद्ध जीवन जगणे कठीण होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. अशातच राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या विविध कोळसा खाणींमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे परिसरात पर्यावणाचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसत आहे. मात्र वेकोली प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी तसेच नव्याने झालेल्या गोयेगाव अशा विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाण परिसरात कमालीचे प्रदूषण वाढलेले आहे. मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोंढे पसरले जात आहे. कोळसा उत्पादनासाठी खोलवर खोदकाम करुन मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. कोळसा खाणीत होणार्‍या ब्लॉस्टींगमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषणही होत आहे. तर उत्पादन केलेला कोळसा वाहून नेण्याकरिता होणारी वाहतुकही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे. प्रदूषणामुळे परिसरातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंतच्या सर्वच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दमा, फुफ्फुसाचे आजार बळावले आहे. प्रदूषणामुळे परिसरातील शेती उत्पादनातही घट झाली आहे. प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने वेकोलि प्रशासन मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही निद्रावस्थेत आहे. त्यांचेही वेकोलिच्या किंवा जिल्ह्यातील विविध कारखाण्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे दुर्लक्ष आहे. वेकोलि विविध फलके लावून व फक्त कार्यक्रम घेऊन पर्यावणाचे संरक्षणाचा कांगावा करीत आहे. वेकोलिने खाण परिसरात वृक्षांची लागवड केली. परंतु त्यांचे संरक्षण करण्यात ते असर्मथ ठरले आहे. वेकोलिच्या या प्रदूषणामुळे कोळसा खाण परिसरातीलच नागरिक नव्हे तर कोळसा खाणीत काम करणारे कामगार व त्या परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे वेकोलि प्रशासन नागरिकांच्या नव्हे तर आपल्या कामगारांच्याही जिवावर उठला आहे.  (वार्ताहर)