शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

By admin | Updated: June 9, 2014 23:32 IST

पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा

शेतकर्‍यांचेही नुकसान : पर्यावरण संरक्षणाचे धिंडवडेसास्ती : पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अर्मयाद उपसा, वाहनांचे वाढते प्रमाण तसेच वाढते औद्योगिकरण हे सर्व पर्यावरण संतुलित राखण्यात बाधक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात मानवाला सुखी व समृद्ध जीवन जगणे कठीण होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. अशातच राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या विविध कोळसा खाणींमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे परिसरात पर्यावणाचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसत आहे. मात्र वेकोली प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी तसेच नव्याने झालेल्या गोयेगाव अशा विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाण परिसरात कमालीचे प्रदूषण वाढलेले आहे. मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोंढे पसरले जात आहे. कोळसा उत्पादनासाठी खोलवर खोदकाम करुन मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. कोळसा खाणीत होणार्‍या ब्लॉस्टींगमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषणही होत आहे. तर उत्पादन केलेला कोळसा वाहून नेण्याकरिता होणारी वाहतुकही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे. प्रदूषणामुळे परिसरातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंतच्या सर्वच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दमा, फुफ्फुसाचे आजार बळावले आहे. प्रदूषणामुळे परिसरातील शेती उत्पादनातही घट झाली आहे. प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने वेकोलि प्रशासन मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही निद्रावस्थेत आहे. त्यांचेही वेकोलिच्या किंवा जिल्ह्यातील विविध कारखाण्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे दुर्लक्ष आहे. वेकोलि विविध फलके लावून व फक्त कार्यक्रम घेऊन पर्यावणाचे संरक्षणाचा कांगावा करीत आहे. वेकोलिने खाण परिसरात वृक्षांची लागवड केली. परंतु त्यांचे संरक्षण करण्यात ते असर्मथ ठरले आहे. वेकोलिच्या या प्रदूषणामुळे कोळसा खाण परिसरातीलच नागरिक नव्हे तर कोळसा खाणीत काम करणारे कामगार व त्या परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे वेकोलि प्रशासन नागरिकांच्या नव्हे तर आपल्या कामगारांच्याही जिवावर उठला आहे.  (वार्ताहर)