बल्लारपूर : येथील ठोक भाजी विक्रेत्यांवरील संकट अद्यापही टळले नाही. भाजी विक्रेत्यांना काॅलरी स्टेडियमचे मैदान खाली करुन जुन्या आठवडी बाजारात जाण्यास सांगण्यात आले. मातम तेथेही मटन मार्केटचे काम सुरु असल्याने आपली दुकाने कुठे लावायची असा प्रश्न विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे. गुरुवारी दुकाने थाटताना विक्रेत्यांना मोठी धावपड करावी लागली.
कोरोनामुळे बाजारातील ठोक भाजी मंडई नगर परिषदेने कॉलऱी मैदानावर हलवली. परंतु, कालरी मैदानाच्या स्टेडियमवर क्रीडा स्पर्धा सुरु होणार असल्यामुळे त्यांना तेथून हलविण्यास सांगितले. त्यामुळे सर्व विक्रेते जुन्या ठिकाणी आली. परंतु, येथे ही नवीन मटन मार्केटचे काम सुरु असल्यामुळे त्यांना बसायचे कुठे हा प्रश्न उभा ठाकला. गुरुवारी त्यांनी मैदानात कसाबसा बाजार मांडला. मात्र त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे नगरपरिषदेने जागेची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
कोट
येथील भाजी मंडईमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापारी, चिल्लर विक्रेते, बल्लारपूर तालुक्यातील लहान शेतकरी खरेदी विक्रीसाठी येतात. मात्र जागेअभावी मोठी अडचण जात आहे. यामुळे सर्व ठोक भाजी विक्रेत्यांना नगर परिषदने तातडीची व्यवस्था करून द्यावी.
= गैबीदास पाझारे,
अध्यक्ष ठोक भाजीपाला संघटना, बल्लारपूर