शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

वसंतराव नाईकांनी कृषिक्रांती केली

By admin | Updated: July 3, 2016 00:50 IST

स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले.

रामभाऊ टोंगे : बल्लापूर येथे कृषीदिन साजराबल्लारपूर : स्व. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कृषिक्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी केले.बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत पंचायत कृषी विभाग व तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थानिक सभागृहात महाराष्ट्रातचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती दिनानिमित्त कृषिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टोंगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, गटविकास अधिकारी भुजंगराव गजभे, कृषी विस्तार अधिकारी अमोल उघडे, सुधाकर खांडरे आदींची उपस्थिती होती.उपसभापती मेश्राम म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न बाळगले होते. त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाया घातला. त्यामुळे शेती उत्पादनात महाराष्ट्राला बळकटी आली. आता मात्र कृषी क्षेत्रावर अवकळा आल्याचे चित्र आहे, अशी त्यांनी टीका केली.संचालन कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी आणि आभार प्रदर्शन तालुका कृषी विस्तार अधिकारी एस. धनंजय यांनी केले. कार्यक्रमाला किन्ही येथील सरपंच जीवनकला आत्राम, उपसरपंच वासुदेव येरगुडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)