शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

वरुर-विरुर (स्टेशन) रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:32 IST

वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढ, नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा: वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे.वरुर ते विरुर (स्टे.) हा १२ किमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, केवळ दोन किमीचे डांबरीकरण यावर्षी करण्यात आले. उर्वरीत १० किमीचा मार्ग उखळला आहे. बºयाच ठिकाणी जुने डांबरीकरण करुन गेले आहे. काही ठिकाणी डांबरीकरण उखळून खालची माती वर आली आहे. मोठ्या खाई पडलेल्या आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्थिती अतिशय वाईट आहे. यंदा पावसापूर्वी डागडुजी करण्यात आली. हे काम करताना नियत्म धाब्यावर ठेवण्यात आले. या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झान्ले आहे. मागील आठवड्यात अनेकांवर गंभीर जखमी होण्याची वेळ आली. सुमारे दोन-तीन वर्षापासून रस्ता दुरुस्तीची सतत मागणी केली जात होती. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले अभियंतास जाग आली नाही. त्यामुळे जाणेयेणे करणे धोक्याचे झाले असून अपघाताचे स्थळ बनले आहे. सध्या रस्त्याची रस्त्याची स्थिती गंभीर असून १० किमीचा रस्ता जाण्यासाठी एक तास लागतो.विरुर परिसरातील धानोरा, कविपेठ, सुब्बई, चिंचोली, अंतरगाव, अन्नुर, भेंडाळा, सिर्सी, टेंभुरवाई या गावातील वाहनचालक राजुरा येथे जाण्यास निघाले असता घरच्या मंडळीना परत येत पावेतो सतत सुखरुप येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागत आहे.अपघाताच्या घटनांत सतत् वाढ होत असल्याने वाहनधारक त्रस्त झालेत. काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे सोडून दिले.नागरिक व वाहनधारकांचे हित लक्षात घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पं.स. सभापती मारोतराव जेनेकर, अविनाश जाधव, भिमय्या अंगलवार, सुब्बईचे सरपंच मारोती आत्राम, पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर, शाहू नारनवरे, रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.