शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला

By admin | Updated: October 19, 2015 01:37 IST

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी ...

शिवसेनेचे नेतृत्व : शासनाचे वेधले लक्ष कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.काटवली ग्रामपंचायतीत समाविष्ठ असणाऱ्या दारिद्र रेषेखालील कुटूंबांना नवीन संगणकीय दाखले देण्यात आले. मात्र त्यात शेकडो गरीब कुटुंबांना डावलण्यात आले. वंचित कुटुंबांचा समावेश पुन्हा बीपीएल यादीत करावा, सन २०१४-१५ अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान शासन वितरित करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक क्रमांक, तलाठी, ग्रामपंचायती व कृषी सहाय्यकांकडे देण्यात आले. मात्र बँकेत अनुदान जमा होत नाही. अनेकवेळा तहसील कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नाही. शेतकऱ्यांचे अनुदान बँकेत त्वरीत जमा करण्यात यावे, नैसर्गिक संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शेतीवरील रोगांचा प्रार्दूभाव दूर करण्याकरीता सहकार्य मिळत नाही. कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी दुकानदाराने दिलेल्या औषधांचा भरमसाठ पैसे खर्च करून खरेदी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना तीळमात्र उपयोग होत नाही. शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अनेक वर्षापासून कुटुंबाच्या उदर निर्वाहाकरीता अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे. पट्टे वितरणातील शासनाने जाचक अटी रद्द करून पट्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांना पट्टे वाटपाची कारवाई करावी, कोठारी, काटवली, खामतुर्ली, ह्या शेती पट्ट्यात सोयाबीन, धान, कापूस यासह अनेक खरीपाची पिके घेतली जातात. तरीही शासनाच्या दप्तरात त्या क्षेत्राची रब्बी पिकांचे गाव म्हणून नोंद आहे. ही नोंद रद्द करून खरीपाची गावे म्हणून नोंद घेण्यात यावी.कोठारी परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाची व्यवस्था नाही. तरी जिवंत नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. औषधी, खते, बियाणे यावर सरकार विक्री मूल्य निर्धारित असते. मग शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर आधारित शेतमालास हमी भाव देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्चात सोमेश्वर पद्मगिरवार, बल्लारपूर न.प. माजी उपाध्यक्ष सिक्की यादव, बल्लारपूर शिवसेना तालुका प्रमुख कमलेश शउक्ला यांच्या नेतृत्वात महिपालसिंग टेकडीवरून प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चा नायब तहसील कार्यालयाच्या पटांगणावर निवेदन देवून विसर्जीत करण्यात आला. त्यात साईनाथ आदे, सुरेश वाढगुरे, रूपेश चौधरी, विश्वास राजुरकर, शैलेश रामटेके, महादेव लोणारे व नानाजी मडावी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. मोर्चात कोठारीसह कवडजई, पळसगाव, मानोरी, इटोली, काटवली, बामणी, आमडी आदी गावातील शेतकरी सहभागी झाले. (वार्ताहर)