शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला

By admin | Updated: October 19, 2015 01:37 IST

बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी ...

शिवसेनेचे नेतृत्व : शासनाचे वेधले लक्ष कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.काटवली ग्रामपंचायतीत समाविष्ठ असणाऱ्या दारिद्र रेषेखालील कुटूंबांना नवीन संगणकीय दाखले देण्यात आले. मात्र त्यात शेकडो गरीब कुटुंबांना डावलण्यात आले. वंचित कुटुंबांचा समावेश पुन्हा बीपीएल यादीत करावा, सन २०१४-१५ अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान शासन वितरित करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक क्रमांक, तलाठी, ग्रामपंचायती व कृषी सहाय्यकांकडे देण्यात आले. मात्र बँकेत अनुदान जमा होत नाही. अनेकवेळा तहसील कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नाही. शेतकऱ्यांचे अनुदान बँकेत त्वरीत जमा करण्यात यावे, नैसर्गिक संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शेतीवरील रोगांचा प्रार्दूभाव दूर करण्याकरीता सहकार्य मिळत नाही. कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी दुकानदाराने दिलेल्या औषधांचा भरमसाठ पैसे खर्च करून खरेदी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना तीळमात्र उपयोग होत नाही. शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अनेक वर्षापासून कुटुंबाच्या उदर निर्वाहाकरीता अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे. पट्टे वितरणातील शासनाने जाचक अटी रद्द करून पट्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांना पट्टे वाटपाची कारवाई करावी, कोठारी, काटवली, खामतुर्ली, ह्या शेती पट्ट्यात सोयाबीन, धान, कापूस यासह अनेक खरीपाची पिके घेतली जातात. तरीही शासनाच्या दप्तरात त्या क्षेत्राची रब्बी पिकांचे गाव म्हणून नोंद आहे. ही नोंद रद्द करून खरीपाची गावे म्हणून नोंद घेण्यात यावी.कोठारी परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाची व्यवस्था नाही. तरी जिवंत नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. औषधी, खते, बियाणे यावर सरकार विक्री मूल्य निर्धारित असते. मग शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर आधारित शेतमालास हमी भाव देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्चात सोमेश्वर पद्मगिरवार, बल्लारपूर न.प. माजी उपाध्यक्ष सिक्की यादव, बल्लारपूर शिवसेना तालुका प्रमुख कमलेश शउक्ला यांच्या नेतृत्वात महिपालसिंग टेकडीवरून प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चा नायब तहसील कार्यालयाच्या पटांगणावर निवेदन देवून विसर्जीत करण्यात आला. त्यात साईनाथ आदे, सुरेश वाढगुरे, रूपेश चौधरी, विश्वास राजुरकर, शैलेश रामटेके, महादेव लोणारे व नानाजी मडावी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. मोर्चात कोठारीसह कवडजई, पळसगाव, मानोरी, इटोली, काटवली, बामणी, आमडी आदी गावातील शेतकरी सहभागी झाले. (वार्ताहर)