शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे.

ठळक मुद्देकन्हाळगावप्रमाणे होते ‘शुटींग ब्लाक’

 निलेश झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले अन कन्हाळगाव, वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटिश काळात कन्हाळगाव आणि वामनपल्लीची शुटींग ब्लाक अशी ओळख होती. शिकारीसाठी आलेले राजे, ब्रिटिश अधिकारी वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. ब्रिटीशांनी केलेल्या शिकारीचा कथा गावातील वृध्द आजही ऐकवितात. आता कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार, अशी आशा वामनपल्लीवासीयांना आहे.ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेले कन्हाळगाव, वामणपल्ली  शुटिंग ब्लाक म्हणून ओळखले जायचे. राजे, ब्रिटिश अधिकारी येथे शिकारीसाठी यायचे. शिकारीसाठी आलेले ब्रिटीश कन्हाळगाव आणि वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. वामनपल्ली येथे गेस्ट हाऊस होते. आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहे. आता शासनाने काही दिवसांपूर्वीच   कन्हाळगाव हा परिसर अभयारण्य घोषित केला आहे. तशी आधीपासूनच येथील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या जंगलात वाघ, बिबटसह अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. 

ब्रिटीशांचे होते शिकारस्थळवामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे. मात्र काळाचा ओघात विस्मृतीत गेलेला वामनपल्लीचा इतिहास कन्हाळगाव अभयारण्य घोषित होताच पुन्हा उजेडात आला आहे. आता गावाचा विकास होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

ब्रिटिश काळात वामनपल्ली गाव महत्त्वाचे ठिकाण होते. आज गाव मागासलेले आहे. ब्रिटिश काळाप्रमाणेच वामनपल्ली येथे वनविभागाने नव्याने गेस्ट हाऊस तयार करावे. अभयारण्याचे प्रवेशव्दार वामनपल्ली येथे उभे करावे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत होणाºया विकासकामात गावाला आणि गावातील बेरोजगारांना प्रथम संधी द्यावी.- साईनाथ कोडापे, माजी सरपंच, लाठी.

 

टॅग्स :forestजंगल