शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे.

ठळक मुद्देकन्हाळगावप्रमाणे होते ‘शुटींग ब्लाक’

 निलेश झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले अन कन्हाळगाव, वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटिश काळात कन्हाळगाव आणि वामनपल्लीची शुटींग ब्लाक अशी ओळख होती. शिकारीसाठी आलेले राजे, ब्रिटिश अधिकारी वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. ब्रिटीशांनी केलेल्या शिकारीचा कथा गावातील वृध्द आजही ऐकवितात. आता कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार, अशी आशा वामनपल्लीवासीयांना आहे.ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेले कन्हाळगाव, वामणपल्ली  शुटिंग ब्लाक म्हणून ओळखले जायचे. राजे, ब्रिटिश अधिकारी येथे शिकारीसाठी यायचे. शिकारीसाठी आलेले ब्रिटीश कन्हाळगाव आणि वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. वामनपल्ली येथे गेस्ट हाऊस होते. आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहे. आता शासनाने काही दिवसांपूर्वीच   कन्हाळगाव हा परिसर अभयारण्य घोषित केला आहे. तशी आधीपासूनच येथील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या जंगलात वाघ, बिबटसह अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. 

ब्रिटीशांचे होते शिकारस्थळवामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे. मात्र काळाचा ओघात विस्मृतीत गेलेला वामनपल्लीचा इतिहास कन्हाळगाव अभयारण्य घोषित होताच पुन्हा उजेडात आला आहे. आता गावाचा विकास होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

ब्रिटिश काळात वामनपल्ली गाव महत्त्वाचे ठिकाण होते. आज गाव मागासलेले आहे. ब्रिटिश काळाप्रमाणेच वामनपल्ली येथे वनविभागाने नव्याने गेस्ट हाऊस तयार करावे. अभयारण्याचे प्रवेशव्दार वामनपल्ली येथे उभे करावे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत होणाºया विकासकामात गावाला आणि गावातील बेरोजगारांना प्रथम संधी द्यावी.- साईनाथ कोडापे, माजी सरपंच, लाठी.

 

टॅग्स :forestजंगल