शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे.

ठळक मुद्देकन्हाळगावप्रमाणे होते ‘शुटींग ब्लाक’

 निलेश झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले अन कन्हाळगाव, वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटिश काळात कन्हाळगाव आणि वामनपल्लीची शुटींग ब्लाक अशी ओळख होती. शिकारीसाठी आलेले राजे, ब्रिटिश अधिकारी वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. ब्रिटीशांनी केलेल्या शिकारीचा कथा गावातील वृध्द आजही ऐकवितात. आता कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार, अशी आशा वामनपल्लीवासीयांना आहे.ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेले कन्हाळगाव, वामणपल्ली  शुटिंग ब्लाक म्हणून ओळखले जायचे. राजे, ब्रिटिश अधिकारी येथे शिकारीसाठी यायचे. शिकारीसाठी आलेले ब्रिटीश कन्हाळगाव आणि वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. वामनपल्ली येथे गेस्ट हाऊस होते. आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहे. आता शासनाने काही दिवसांपूर्वीच   कन्हाळगाव हा परिसर अभयारण्य घोषित केला आहे. तशी आधीपासूनच येथील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या जंगलात वाघ, बिबटसह अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. 

ब्रिटीशांचे होते शिकारस्थळवामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे. मात्र काळाचा ओघात विस्मृतीत गेलेला वामनपल्लीचा इतिहास कन्हाळगाव अभयारण्य घोषित होताच पुन्हा उजेडात आला आहे. आता गावाचा विकास होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

ब्रिटिश काळात वामनपल्ली गाव महत्त्वाचे ठिकाण होते. आज गाव मागासलेले आहे. ब्रिटिश काळाप्रमाणेच वामनपल्ली येथे वनविभागाने नव्याने गेस्ट हाऊस तयार करावे. अभयारण्याचे प्रवेशव्दार वामनपल्ली येथे उभे करावे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत होणाºया विकासकामात गावाला आणि गावातील बेरोजगारांना प्रथम संधी द्यावी.- साईनाथ कोडापे, माजी सरपंच, लाठी.

 

टॅग्स :forestजंगल