शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

१४ आदर्श गाव प्रकल्पात उखर्डा गाव

By admin | Updated: December 21, 2015 01:13 IST

राज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.

स्वच्छता अभियानात नावलौकिक : मूल तालुक्यातील राजगडचाही समावेशप्रविण खिरटकर वरोराराज्य शासनाने आदर्श गाव प्रकल्पात राज्यातील दोनशे गावांची निवड केली. त्यातील १४ गावांनी आदर्श गाव प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड व वरोरा तालुक्यातील उखर्डा गावांचा समावेश आहे.वरोरा तालुक्यातील ६०० लोकसंख्या असलेल्या उखर्डा गावात १३० कुटुंबे आहेत. १२९४ हेक्टर शेत जमीन आहे. त्यातील अकराशे हेक्टर जमिनीवर नागरिक पिके घेत आहेत. उखर्डा गावात सन २००० पासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.त्यात संपूर्ण गाव सहभागी होत असते. ग्रामस्थांनी श्रमदानातून अनेक कामे केली आहेत. शासकीय जमिनी श्रमदानातून स्वच्छ करीत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन केल्याने झाडे आता डोलाने उभे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा आदर्श ठेवीत असे एक ना अनेक कामे श्रमदानातून ग्रामस्थांनी केली आहेत. सप्तसूत्रीेचे पालन, पानलोट विकास कामे, एक गाव एक गणपती, एकच दुर्गा देवी असे अनेक उपक्रम उखर्डा ग्रामस्थांनी राबविल्याने उखर्डा गावाला शासनाचा तालुका स्तरावरील दोनदा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे.आता उखर्डा गावाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळून गावातील कामे पूर्णत्वास येणार आहे.गावाचा एकोपा अचानक सहा वर्ष थांबलासन २००० पासून उखर्डा गावात एकोप्याने सर्व काही सुरु असताना सन २००६ मध्ये निवडणूका आल्याने गाव दुभंगले व एकोपा तुटला. अनेकांची मने दुखावली. त्यामुळे उखर्डा गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची लोकचळवळ उभारणारे निवृत्त शिक्षक भाऊराव वैद्य कमालीचे अस्वस्थ होवून गेले. त्यांना काही कळेनासे झाले. परंतु विचार विकास सामाजिक संस्था वरोराचे किशोर चौधरी यांनी भाऊराव वैद्य यांना उखर्डा गावात उपक्रम सुरु करण्याबाबत विनवनी केली. परंतु एवढे दुंभगलेले गाव एकत्र आणणार कसे असे म्हणत प्रारंभी भाऊराव वैद्य यांनी नकार दिला. किशोर चौधरी यांनी आपला हेका सोडला नाही. त्यामुळे भाऊराव वैद्य यांनी होकार देवून किशोर चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यासह उखर्डा गावात जावून भेट दिली. नागरिकांची मने जिंकत परत सहा वर्ष थांबलेले ग्रामस्वच्छता अभियान २०१२ पासून सुरु झाले. ते आजही अविरतपणे सुरु आहे. पोपटराव पवारांची उखर्डा गावास भेट १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उखर्डा गावात भेट देवून पानलोट विकास कामे, श्रमदानाची, स्वच्छतेची पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे अतिरिक्त कृषी मुख्य सचिव डी.के. जैन, अपर सचिव कराड, उपसंचालक जगताप, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे आदी उपस्थित होते.