शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

उसगाववासीयांनी तब्बल तीन तास रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.  दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ  बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोपर्यंत  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मनाई असतानाही वाहतूक सुरूचउसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliceपोलिस