शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा

By admin | Updated: March 18, 2015 01:15 IST

शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन ...

बल्लारपूर: शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी किन्ही येथे रविवारी आयोजित कृषी मेळाव्यात केले.बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा किन्ही येथील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला बोबाटे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती सुमन लोहे, किन्ही येथील सरपंच वासुदेव येरगुडे, उपसरपंच जीवनकला आलाम, कृषी मंडळ अधिकारी मारोतराव वरभे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी, गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजने, विस्तार अधिकारी मोल उघडे, सुधाकर खांडरे, आमडचे दादाजी वांढरे, ग्रामसेवक एकनाथ चाफले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, आजघडीला शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. परिणामी खरीप व रबी हंगामावर अवकळा ओढवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस यात भर टाकत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. बी.गजभे, एम. पी. वरभे, वासुदेव येरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. संचालन देवेंद्र डुंबरे यांनी तर आभार अमोल उघडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणातत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)