शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा

By admin | Updated: March 18, 2015 01:15 IST

शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन ...

बल्लारपूर: शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी किन्ही येथे रविवारी आयोजित कृषी मेळाव्यात केले.बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा किन्ही येथील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला बोबाटे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती सुमन लोहे, किन्ही येथील सरपंच वासुदेव येरगुडे, उपसरपंच जीवनकला आलाम, कृषी मंडळ अधिकारी मारोतराव वरभे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी, गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजने, विस्तार अधिकारी मोल उघडे, सुधाकर खांडरे, आमडचे दादाजी वांढरे, ग्रामसेवक एकनाथ चाफले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, आजघडीला शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. परिणामी खरीप व रबी हंगामावर अवकळा ओढवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस यात भर टाकत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. बी.गजभे, एम. पी. वरभे, वासुदेव येरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. संचालन देवेंद्र डुंबरे यांनी तर आभार अमोल उघडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणातत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)