शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा

By admin | Updated: March 18, 2015 01:15 IST

शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन ...

बल्लारपूर: शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी किन्ही येथे रविवारी आयोजित कृषी मेळाव्यात केले.बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा किन्ही येथील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला बोबाटे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती सुमन लोहे, किन्ही येथील सरपंच वासुदेव येरगुडे, उपसरपंच जीवनकला आलाम, कृषी मंडळ अधिकारी मारोतराव वरभे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी, गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजने, विस्तार अधिकारी मोल उघडे, सुधाकर खांडरे, आमडचे दादाजी वांढरे, ग्रामसेवक एकनाथ चाफले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, आजघडीला शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. परिणामी खरीप व रबी हंगामावर अवकळा ओढवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस यात भर टाकत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. बी.गजभे, एम. पी. वरभे, वासुदेव येरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. संचालन देवेंद्र डुंबरे यांनी तर आभार अमोल उघडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणातत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)