शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

फळ पिकवताना केमिकलचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:16 IST

अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : अशी फळे खाणे टाळावे, आहार तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.सध्या आंब्याच्या हंगामाला सुरूवात झाली. शहरापासून खेडेगावापर्यंत फळविक्रेते गाड्यांवर फळांचा राजा आंबा, चिकु, सफरचंद, केळी, डाळिंब, कलींगड, खरबूज, टरबूज विक्री होत आहे. परंतु बाजारातील ही फळे खरोखर नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत का, याचा विचार कुणीही करत नाही, किंबहुना ही आपली जबाबदारी नाही, असे म्हणून अनैसर्गिकरित्या पिकवलेली फळे खरेदी करीत आहेत. तर दुसरीकडे अनैसर्गिक पिकविलेली फळे घेण्याव्यतिरिक्त बाजारात दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अशी फळे सेवन केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिल्या जाते. आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असल्याचे आरोग्य विभाग व आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी राजापुरी, लंगडा, हापूस, केशर, पायरी अशा विविध जातींचे आंबे चंद्रपूरच्या बाजारामध्य अल्प दरात मिळत होते.आता परिस्थिती बदलली आहे. वेगवेगळ्या जातीचे हे आंबे रत्नागिरी, कोकण, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून आण्यात आले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेली नाहीत. विविध रसायनांचा वापर करून पिकविल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.आंबे, चिकू, केळी ही कार्बाईड विषारी पावडर वापरून किंवा लिक्विडचा वापर करून मोठे व्यापारी गोडाऊनमध्ये सर्रास पिकवितात. त्यानंतर ती फळे बाजारात विक्री जातात. सफरचंदावरसुद्धा वरून व्हॅसलीन किंवा मेनाचा मुलामा लावल्या जातो, अशी माहिती पुढे आली आहे.द्राक्ष बागावर मोठ्या प्रमाणात विषारी कीटकनाशकाच्या फवरण्या करतात. तर कलींगडावर घातक रासायन इंजेक्शनद्वारे सोडल्या जाते. केळीसुद्धा आरोग्याला घातक असणाºया लिक्विडमध्ये टाकली जातात. त्यानंतर पाण्यातून काढून पिकविण्यात येते. अनैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी फळे सेवन न करणे हाच उपाय असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.गावरान आंबे गायबकाही वर्षांपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या आमराईतील आंबे तोडून आणल्या जात होती. परंतु सध्या गावरान आंब्याचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेत व आमराईतील आंब्याची झाडे वाळली. गावरान आंबा फक्त नावापुरातच उरला आहे

टॅग्स :fruitsफळे