शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

चंद्रपूर बाजार समितीची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:38 IST

यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देकमी उत्पादनाचा फटका : हमी भावाने केवळ ६१ क्विंटल सोयाबीन खरेदी

मंगेश भांडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विविध पिकांच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाल्याने बाजार समित्यांची आवकही निम्म्यावर आली आहे.शासनाने सोयाबीन खरेदीसाठी आधारभूत किमंत जाहीर करून शासकीय खरेदी सुरू केली होती. मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ ६१.७० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.यावर्षी खरिप हंगामाच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे उशिरा पिकांची लागवड झाली. त्यानंतर जेमतेम पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, धान पीक जोमात होते. मात्र पीक हाती येण्याच्या स्थितीत असताना सोयाबीन, कापूस, धान पिकांवर विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने पिके नष्ट झाली.धानावरील मावा-तुडतुडा, करपा अशा रोगांमुळे उभ्या पिकाची तणस झाली. तर कापूस पीकही अंतिम टप्प्यात असताना बोंड अळीने घात केला. त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. सध्या सर्व पिके निघाली असून कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने झाडावरच कापूस फुटत आहे. ज्यांचे कापूस आणि सोयाबीन निघाले ते मोजकेच शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीची आवक निम्म्यावर दिसून येत आहे.खासगी खरेदीही निम्म्यावरचंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पद्धतीने मालाची विक्री होते. यात कापूस पिकाला ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपये भाव दिला जात आहे. मात्र आतापर्यंत केवळ २४ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर सोयाबीनला २ हजार ३०० ते २ हजार ८६० रूपये भाव दिला जात असून केवळ १२ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.तारण योजनेत १३०० क्विंटल शेतमालशेतमालाची विपणन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन पिकासाठी तारण योजना सुरू केली आहे. यात ७९ शेतकऱ्यांनी जवळपास १३०० क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. तीन ते चार महिन्यानंतर या मालाचा लिलाव होणार आहे.यावर्षी उत्पादन कमी असल्याने बाजार समितीची आवक फार कमी आहे. हमी भावाने सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीलाही शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.- संजय पावळेसचिव, बाजार समिती चंद्रपूर.