शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चंद्रपूर बाजार समितीची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:38 IST

यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देकमी उत्पादनाचा फटका : हमी भावाने केवळ ६१ क्विंटल सोयाबीन खरेदी

मंगेश भांडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यावर्षीचा अत्यल्प पाऊस व विविध रोगांचा प्रार्दुभावाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विविध पिकांच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाल्याने बाजार समित्यांची आवकही निम्म्यावर आली आहे.शासनाने सोयाबीन खरेदीसाठी आधारभूत किमंत जाहीर करून शासकीय खरेदी सुरू केली होती. मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ ६१.७० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.यावर्षी खरिप हंगामाच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे उशिरा पिकांची लागवड झाली. त्यानंतर जेमतेम पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, धान पीक जोमात होते. मात्र पीक हाती येण्याच्या स्थितीत असताना सोयाबीन, कापूस, धान पिकांवर विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने पिके नष्ट झाली.धानावरील मावा-तुडतुडा, करपा अशा रोगांमुळे उभ्या पिकाची तणस झाली. तर कापूस पीकही अंतिम टप्प्यात असताना बोंड अळीने घात केला. त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. सध्या सर्व पिके निघाली असून कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने झाडावरच कापूस फुटत आहे. ज्यांचे कापूस आणि सोयाबीन निघाले ते मोजकेच शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीची आवक निम्म्यावर दिसून येत आहे.खासगी खरेदीही निम्म्यावरचंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पद्धतीने मालाची विक्री होते. यात कापूस पिकाला ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपये भाव दिला जात आहे. मात्र आतापर्यंत केवळ २४ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर सोयाबीनला २ हजार ३०० ते २ हजार ८६० रूपये भाव दिला जात असून केवळ १२ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.तारण योजनेत १३०० क्विंटल शेतमालशेतमालाची विपणन व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन पिकासाठी तारण योजना सुरू केली आहे. यात ७९ शेतकऱ्यांनी जवळपास १३०० क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. तीन ते चार महिन्यानंतर या मालाचा लिलाव होणार आहे.यावर्षी उत्पादन कमी असल्याने बाजार समितीची आवक फार कमी आहे. हमी भावाने सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीलाही शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.- संजय पावळेसचिव, बाजार समिती चंद्रपूर.