शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:18 IST

मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देतापमानात वाढ : हवामान केंद्राची जागा बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.जगाच्या नकाशावर तापमानाच्या बाबतीत ब्रम्हपुरचे नाव कोरल्या गेले आहे. वाढत्या तापमानाची कारणे काय असू शकतात, याबाबत कर्तवितर्क लागले जात असले तरी, ब्रम्हपुरीचे हवामान केंद्रावरच अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.या कारणाला आधारही तसाच आहे. ३० एप्रिलला सिंदेवाही येथील कृषी विभागाने घेतलेले सिंदेवाहीचे तापमान ४२.७ होते. त्याचवेळी ब्रम्हपुरीचे तापमान ४७.० एवढे होते. १ मेला ब्रम्हपुरीचे तापमान ४७.१ होते तर सिंदेवाहीचे तापमान ४३.४ होते. ब्रम्हपुरी व सिंदेवाहीचे अंतर ४५ किमी आहे. अक्षाशीय अंतरावरून लक्षात घेतल्यास हे दोन्ही ठिकाण २० डिग्री ३६ मिनिट उत्तर ब्रम्हपुरी तर २० डिग्री १७ मिनिट उत्तर सिंदेवाही असे आहे. या दोन ठिकाणामधील अक्षाशीय अंतरात फक्त १९ मिनिटांचा फरक आहे. परंतु तापमानात मात्र तीन ते चार डिग्री फरक जाणवत आहे, हे शक्य असू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र बदलुन दुसऱ्या ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र ज्या ठिकाणी आहे, ती जागा चारही बाजूने वेढलेली आहे. त्यामुळे हवेचे अभिसरण होत नसल्याने सतत तापमानात वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ब्रम्हपुरीचे तापमान सतत जास्त दाखविले जात आहे. जंगलाने वेढलेला आणि प्रदूषण नसलेला हा भाग असल्याने येथे जास्त तापमान वाढण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील भीरा या अशाच चुकीचे तापमान दाखविणाºया केंद्रात हवामान खात्याने सुधारणा केल्या आणि आज तेथील तापमान कमी आहे. तसेच ब्रम्हपुरी येथीलही केंद्र बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र आज ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण योग्य नाही. त्यामुळे चुकीचे तापमान नोंदविले जात आहे. सदर केंद्र बदलविणे आवश्यक आहे. याबाबत आपण हवामान खात्याकडे तक्रार केली आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा सदस्य,केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली

टॅग्स :weatherहवामान