शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ब्रह्मपुरीत अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:18 IST

मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देतापमानात वाढ : हवामान केंद्राची जागा बदलण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरीच्या तापमानात सात्यत्याने वाढ होत आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४७ अंशावर पोहचला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. परिणामी अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती दुपारच्यावेळी ब्रह्मपुरीमध्ये बघायला मिळत आहे.जगाच्या नकाशावर तापमानाच्या बाबतीत ब्रम्हपुरचे नाव कोरल्या गेले आहे. वाढत्या तापमानाची कारणे काय असू शकतात, याबाबत कर्तवितर्क लागले जात असले तरी, ब्रम्हपुरीचे हवामान केंद्रावरच अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.या कारणाला आधारही तसाच आहे. ३० एप्रिलला सिंदेवाही येथील कृषी विभागाने घेतलेले सिंदेवाहीचे तापमान ४२.७ होते. त्याचवेळी ब्रम्हपुरीचे तापमान ४७.० एवढे होते. १ मेला ब्रम्हपुरीचे तापमान ४७.१ होते तर सिंदेवाहीचे तापमान ४३.४ होते. ब्रम्हपुरी व सिंदेवाहीचे अंतर ४५ किमी आहे. अक्षाशीय अंतरावरून लक्षात घेतल्यास हे दोन्ही ठिकाण २० डिग्री ३६ मिनिट उत्तर ब्रम्हपुरी तर २० डिग्री १७ मिनिट उत्तर सिंदेवाही असे आहे. या दोन ठिकाणामधील अक्षाशीय अंतरात फक्त १९ मिनिटांचा फरक आहे. परंतु तापमानात मात्र तीन ते चार डिग्री फरक जाणवत आहे, हे शक्य असू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र बदलुन दुसऱ्या ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र ज्या ठिकाणी आहे, ती जागा चारही बाजूने वेढलेली आहे. त्यामुळे हवेचे अभिसरण होत नसल्याने सतत तापमानात वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ब्रम्हपुरीचे तापमान सतत जास्त दाखविले जात आहे. जंगलाने वेढलेला आणि प्रदूषण नसलेला हा भाग असल्याने येथे जास्त तापमान वाढण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील भीरा या अशाच चुकीचे तापमान दाखविणाºया केंद्रात हवामान खात्याने सुधारणा केल्या आणि आज तेथील तापमान कमी आहे. तसेच ब्रम्हपुरी येथीलही केंद्र बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.ब्रम्हपुरीचे हवामान केंद्र आज ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण योग्य नाही. त्यामुळे चुकीचे तापमान नोंदविले जात आहे. सदर केंद्र बदलविणे आवश्यक आहे. याबाबत आपण हवामान खात्याकडे तक्रार केली आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा सदस्य,केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली

टॅग्स :weatherहवामान