शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

व्यवसाय प्रशिक्षकांचा दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामावर सार्वत्रिक बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

चंद्रपूर : गेल्या सहा वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षकांची शासकीय धोरणांमुळे हेळसांड होत आहे. राज्यातील ५५० माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील ...

चंद्रपूर : गेल्या सहा वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षकांची शासकीय धोरणांमुळे हेळसांड होत आहे. राज्यातील ५५० माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील सुमारे १२०० व्यवसाय प्रशिक्षक हे व्यवसाय विषय शिकविण्यासाठी विविध विद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५ पासून राज्यात या विषयांना मान्यता देऊन सुरुवात झालेली आहे. मात्र, आता या प्रशिक्षकांवर शासनाकडून अन्याय केला जात असून जोपर्यंत समस्या सोडविण्यात येणार नाही, तोपर्यंत दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षक महासंघाने घेतला आहे.

या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.

या प्रशिक्षकांना दहा महिन्यांचेच वेतन एका शैक्षणिक वर्षात दिले जाते. मागील वर्षी १ मे २०२० ते १७ डिसेंबर २०२० पर्यंत विनावेतन घरी बसविण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर या प्रशिक्षकांना मे महिन्यापासून शालेय कामकाजातून विनावेतन घरी बसविण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या दहावीच्या निकालासंबंधित निर्णयानंतर व परीक्षा मंडळाच्या आदेशाने या प्रशिक्षकांना अजूनही संबंधित विभागाकडून अधिकृत शासकीय आदेश मिळाला नाही. शासकीय निर्णयाच्या धरसोड वृत्तीमुळे व उदासीनतेमुळे प्रशिक्षकांना मागील शैक्षणिक वर्षात सात महिने वेतनापासून वंचित ठेवण्यात आले होते. आताही मे महिन्यापासून प्रशिक्षकांची उपासमार सुरू आहे. कोविड महामारीपासून औषधोपचाराचा गंभीर प्रश्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न प्रशिक्षकांसमोर उभा आहे. मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यासोबत वारंवार बैठका होऊनही यावर काहीच ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही. शैक्षणिक क्षेत्राचे पावित्र्य जपावे व या महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी मागणी व्यवसाय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शोभराज खोंडे, महासचिव मंगेश जाधव, कोषाध्यक्ष अनुकेश मातकर यांनी केली आहे. जोपर्यंत समस्या सोडविण्यात येणार नाही, तोपर्यंत दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.