शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

व्यवसाय प्रशिक्षकांचा दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामावर सार्वत्रिक बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

चंद्रपूर : गेल्या सहा वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षकांची शासकीय धोरणांमुळे हेळसांड होत आहे. राज्यातील ५५० माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील ...

चंद्रपूर : गेल्या सहा वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षकांची शासकीय धोरणांमुळे हेळसांड होत आहे. राज्यातील ५५० माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील सुमारे १२०० व्यवसाय प्रशिक्षक हे व्यवसाय विषय शिकविण्यासाठी विविध विद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५ पासून राज्यात या विषयांना मान्यता देऊन सुरुवात झालेली आहे. मात्र, आता या प्रशिक्षकांवर शासनाकडून अन्याय केला जात असून जोपर्यंत समस्या सोडविण्यात येणार नाही, तोपर्यंत दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षक महासंघाने घेतला आहे.

या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.

या प्रशिक्षकांना दहा महिन्यांचेच वेतन एका शैक्षणिक वर्षात दिले जाते. मागील वर्षी १ मे २०२० ते १७ डिसेंबर २०२० पर्यंत विनावेतन घरी बसविण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर या प्रशिक्षकांना मे महिन्यापासून शालेय कामकाजातून विनावेतन घरी बसविण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या दहावीच्या निकालासंबंधित निर्णयानंतर व परीक्षा मंडळाच्या आदेशाने या प्रशिक्षकांना अजूनही संबंधित विभागाकडून अधिकृत शासकीय आदेश मिळाला नाही. शासकीय निर्णयाच्या धरसोड वृत्तीमुळे व उदासीनतेमुळे प्रशिक्षकांना मागील शैक्षणिक वर्षात सात महिने वेतनापासून वंचित ठेवण्यात आले होते. आताही मे महिन्यापासून प्रशिक्षकांची उपासमार सुरू आहे. कोविड महामारीपासून औषधोपचाराचा गंभीर प्रश्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न प्रशिक्षकांसमोर उभा आहे. मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यासोबत वारंवार बैठका होऊनही यावर काहीच ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही. शैक्षणिक क्षेत्राचे पावित्र्य जपावे व या महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी मागणी व्यवसाय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शोभराज खोंडे, महासचिव मंगेश जाधव, कोषाध्यक्ष अनुकेश मातकर यांनी केली आहे. जोपर्यंत समस्या सोडविण्यात येणार नाही, तोपर्यंत दहावी व बारावीच्या निकालासंबंधी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.